खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
सरकारी अपयशाला जाब विचारण्यासाठी आम आदमी पार्टी महाराष्ट्रव्दारे आयोजित राज्यव्यापी भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात “आपली सुराज्य मोहीम”चंद्रपूर येथून सुरू होऊन चार हजार चारशे किलोमीटरचा प्रवास करून राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये संघटन उभारणीचे कार्य करत असून राज्यातील शेतकऱ्यांचे,कामगारांचे,कोकणातील मच्छीमारांचे,असे एक ना अनेक प्रश्न घेऊन जनतेपर्यंत जात आहोत…सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे भेट घेतल्यानंतर रत्नागिरी आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे सुराज्य मोहीम दाखल झाली..
आगामी येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सदर सुराज्य यात्रा ही अति महत्त्वाची आहे…आम आदमी पार्टी राज्यातील आगामी सर्वच स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ते ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका असतील हे पूर्ण ताकदीने लढणार आहे त्या अनुषंगाने पक्षाची मजबूत बांधणी सुरू आहे असे डॉ पठाण यांनी सांगितले.आज खोपोलीमध्ये आम आदमी पार्टी उत्कृष्ट रित्या काम करत आहे आणि मजबूत विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका निभावत असून शहरातील मुख्य समस्यांवर दररोज रस्त्यावर असते शहरातील पाण्याचा प्रश्न असो, गटारींचा प्रश्न असो, शाळांचा प्रश्न असो, रुग्णालयाचा प्रश्न असो, रस्त्यांचे प्रश्न असो किंवा इतरही कोणतेही प्रश्न असो आम आदमी पार्टी प्रत्येक मुद्द्यावर आपले आवाज उठवत आहे.
खोपोली नगरपरिषदेतील आम्ही सर्वच जागेवर आपले उमेदवार उभे करणार आहोत आणि पूर्ण ताकदीने खोपोली नगर परिषदेची निवडणूक लढू असे खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले.सुराज्य मोहीम अंतर्गत आम आदमी पार्टी राज्य सचिव डॉक्टर अभिजीत मोरे, राज्य संघटन मंत्री एडवोकेट मनिष मोडक, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष डॉ रविंद्र जाधव, पनवेल शहर संघटक श्री चिमाजी शिंदे, पनवेल शहर पदाधिकारी अँड जयसिंग शेरे, खोपोली शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.