अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
शैक्षणिक वर्ष सरता सरता वार्षिक परीक्षा संपली रे संपली की उन्हाळ्याच्या सुट्यांची मुलेआतुरतेने वाट पाहत असतात. उन्हाळ्याच्या सुट्या म्हटले की वर्षभर शाळा व अभ्यास यांत गुंतल्यामुळे मुले मामाच्या गावाला जाण्यासाठी तयारच असतात.शालेय परीक्षा आता उरकल्या असून,बहुतांश शाळांना उन्हाळी सुट्टी पडली आहे…उन्हाळी सुट्टी पडताच लहानग्यांना मामाच्या गावची ओढ लागते…तिकडे गेल्यावर तेथील शेती, शिवार, शेतीतील विहीर, तलाव येथे मनसोक्त फिरण्याचा आनंद घेणे तासंतास विहिरीत पोहणे, कैऱ्या खाणे, विविध प्रकारचे खेळ खेळणे असे एक ना अनेक प्रकारच्या मौज मस्ती करायला मिळत असतात म्हणून मुलांना मामाच्या गावी जाण्याचे वेध लागलेले असतात. परंतु स्पर्धेच्या युगात उन्हाळ्याच्या सुटीतील मामाचे गाव पोरके होत चालले आहे.
सुट्टी म्हणजे बालगोपाळांसाठी आनंदाची पर्वणीच असते. मग ती सुट्टी कोणतीही असो. त्यात उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे तर या चिमुरड्यांना सोन्याहून पिवळेच. नो आभ्यास, नो कटकट, नो पालकांची झंझट. सुमारे दोन महिने मौज-मजा अन् मस्तीच.ग्रामीण भागातील मुलांचा आजही खेळण्याकडे कल आहे…रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अलिबाग नगरपरिषद स्व. शरद (भाऊ) पांडुरंग जगे उद्यान सध्या लहानग्या बालगोपाळांनी फुलून गेले आहे… हे लहानगे उन्हाळ्याच्या सुट्टीतील आनंदाची पर्वणी लुटताना दिसत आहेत…अप्रिय घटनांमुळे मुलांच्या उन्हाळ्याची सुट्टी नकोशी व्हायला नको,याची खबरदारी पालकवर्गही घेताना दिसत आहे..उद्यानातील पाळणे,घसरगुंडी,सीसो हे लहानग्यांच्या आकर्षणाचा भाग ठरलाय…या उद्यानात बालगोपाळांची जणूकाही जत्राच भरल्याचे चित्र आहे…