पाच डमी आतंकवादी रेवदंडा पोलिसांच्या ताब्यात… आतंकवाद्याच्या ताब्यातील आरडीएक्स व रायफल जप्त…

0
10

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी केलेल्या सुचनेनुसार राज्यातील किनारी भागात सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत.याअंतर्गत, रायगड पोलिसांनी, विविध विभागातील अधिकारी कर्मचारी समन्वयाने, समुद्रकिनारे, बंदरे, गोदी आणि सागरी मार्गांसह सर्व किनारी भागात फोकस अभियान अंतर्गत गस्त वाढवली आहे.या गस्ती दरम्यान तपासणी करीत असताना साळाव तपासणी नाका व कोर्लई येथे पाच डमी आतंकवादी सहित डमी आरडीएक्स व एक रायफल मिळून आली आहे.

पहेलगाम येथील पाकिस्तानी अतिरेकी यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशात तणाव वाढला आहे.भारत आणि पाकिस्तानमधील या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, रायगड पोलिसांनी फोकस सुरक्षा कवच’ नावाचे ऑपरेशन रायगड जिल्ह्यातील पोलिस स्टेशन अंतर्गत सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत, सागरी गस्त वाढविण्यात आली आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक अभितजित शिवथरे, सागरी सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक अभिजित भुजबळ यांच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली फोकस नामक सागरी सुरक्षा कवच अभियान १३मे २०२५रोजी आयोजित करण्यात आले होते.
फोकस या अभियान अंतर्गत रेवदंडा पोलिस स्टेशन अंतर्गत समुद्रातून काही डमी आतंकवादी हे आरडीएक्स ,व रायफल्स घेऊन जात असून ते कुठल्यातरी समुद्रकिनारी अथवा खाडी किनारी उतरण्याचा प्रयत्न करतील असा संदेश फिरविण्यात आला होता. या संदेशाच्या अनुषंगाने रेवदंडा पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि सागर सुरक्षा दलाचे सदस्य, तसेच इतर विभागाचे सुरक्षा रक्षक यांची गस्त वाढविण्यात आली होती.

मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील मच्छीमारी जेट्टीवर लक्ष्मी बोट नंबर IND MH03MM4585 या बोटीतून दोन इसम हे उतरत असून त्यातील एकाने शर्ट पँट तर दुसऱ्याने टी शर्ट व पँट परिधान केली आहे.त्यांनी त्याची हालचाल ही संशयास्पद असून त्यांच्याकडे काही सामानदेखील आहेत.त्या ठिकाणी असणारे पेण पोलिस ठाणे येथे कार्यरत असणारे पोलिस नाईक पवार, बारवाई पोलिस पाटील संतोष घोसाळकर,सुरक्षा वॉर्डन मिलिंद सरलेकर, सागर सुरक्षा दलाचे सदस्य (रक्षक) संतोष टावरी यांनी सदर संशयित दोन इसमाची तपासणी केली असता त्यांच्याकडे असणाऱ्या एका बॅगमध्ये आरडीएक्स लिहिलेला सफेद आवरण असलेला बॉक्स मिळून आला.

सदर माहिती ही तातडीने रेवदंडा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत किरवले यांना कळवली असता ते तातडीने काही कर्मचारी घेऊन कोर्लई  जेट्टी येथे आले. त्यांची माहिती घेतली असता ते रेड फोर्सचे डमी आतंकवादी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना घेऊन ते रेवदंडा पोलिस ठाण्यात आले.

तद्नंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील मुरुड,रोहा आणि अलिबाग या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या  मुरुड तालुक्यातील साळाव येथील तपासणी नाका येथे बंदोबस्तसाठी असणारे रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक श्रीराम पडवळ, वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार गुरव, खोत, रेवदंडा पोलिस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार ठाकूर, पोलिस मुख्यालय येथील पोलिस हवालदार शिवा,, रेवदंडा पोलिस ठाणे येथील पोलिस शिपाई पोळे, पोलिस मुख्यालय येथील पोलिस शिपाई गावडे,लांडगे, साळाव पोलिस पाटील मेहबूब गोरमे आदींच्या पथकाने आलेल्या एका संशयित वाहनामध्ये तीन जण होते. या वाहनाची तपासणी केली असता त्यांना त्यांचे वाहनाची तपासणी केली असता त्यांचे बॅगेमध्ये आरडीएक्स लिहिलेला सफेद आवरण असलेला बॉक्स सापडला.तसेच त्या वाहनाच्या डिकीमध्ये  इसास डी 44 रायफल  मिळून आल्याने त्याचे कडे अधिक तपासणी केली असता  ते रेड फोर्स चे जवान असल्याचे निष्पन्न झाले.
मच्छिमारांना सतर्क राहण्याचा आणि बोटींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणताही अनधिकृत व्यक्ती समुद्रमार्गे प्रवेश करू नये यासाठी मासेमारी बोटींच्या सर्व प्रवेश आणि निर्गमन बिंदूंवर(ठिकाण ) येथे तपासणी तीव्र करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे सर्व उपाय केले जात आहेत.विशेषतः २६/११ च्या मुंबई हल्ल्यात दहशतवादी समुद्री मार्गाने आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचालींची माहिती ताबडतोब पोलिसांना किंवा जवळच्या सुरक्षा एजन्सीला देण्याचे आवाहन रायगड पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.