अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणाऱ्या पाली- भूतवली धरणात इब्राहिम आझीज खान (वय २४ वर्ष ), खलील अहमद शेख( वय २४ वर्ष ) या दोन तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे… दोन्ही तरुण हे गोवंडी (मुंबई) येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्हा पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मुंबई महानगर पालिका हद्दीतील गोवंडी येथील इब्राहिम आझीज खान,खलील अहमद शेख व हितेश जितेंद्र कांदू (वय 25 वर्ष ) हे तीन तरुण रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने माथेरान येथे एक दिवसीय माथेरान ट्रिप करून परतू या उद्देशाने ते त्यांच्या एका पाळीव कुत्र्यासह दिनांक १८मे २०२५ रोजी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास एक चार चाकी वाहनाने कर्जत तालुक्यातील नेरळ विभागात असणाऱ्या पाली- भूतवली धरण परिसरात आले होते. पाली भुतवली धरणात अंघोळ करून माथेरान येथे लवकर जाऊ यासाठी आज पहाटे साडे पाच ते सहाच्या दरम्यान हे तिघे तरुण स्नानासाठी धरणाच्या पाण्यात उतरले…मात्र काही वेळातच इब्राहिम खान,खलील शेख यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या घेत पाण्यात बुडत असताना सोबत असणारा त्याचा मित्र हितेश जितेंद्र कांदू याने पहिले. हितेश कांदू हा ताबडतोब पाण्याच्या बाहेर येऊन मदतीसाठी स्थानिकांना बोलवले असता स्थानिक नागरिक यांच्या मदतीने हितेश कांदू याने त्याचे बुडालेल्या मित्रांना शोधण्यास यश आले.हितेश कांदू याने सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास नेरळ पोलिस ठाण्यात पाली भुतवली धरणात त्याचे मित्र इब्राहिम खान,खलील शेख यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती दिली.
सदर माहिती मिळताच नेरळ पोलिस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक भास्कर गच्चे हे पोलिस शिपाई गणेश पाटील यांच्यासह घटना स्थळी गेले. तेथे मृतांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्या सोबत असणाऱ्या कुत्र्यांनी पहिले असता त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्याच्या डोळ्यातून येणारे अश्रू पाहून उप पोलीस निरीक्षक भास्कर गच्चे हे पोलिस शिपाई गणेश पाटील यांच्या देखील डोळ्यात पाणी आले असल्याची माहिती भास्कर गच्चे यांनी दिली.सदर मृतदेह हे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन साठी नेण्यात आले आहे.माती माफिया यांच्याकडून धरणातील माती काढली जाऊ असल्याठिकाणी खड्डा होतो. मात्र बाहेरून आलेल्या पर्यटकांना याची माहिती नसते. त्यामुळे त्यांचा पाण्याचा अंदाज चुकतो आणि अशा प्रकारच्या घटना घडत असतात. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.