अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन)
वीजदराबाबत मोठी तफावत,सिक्युरिटी डिपॉझिट भरण्यास विरोध,वीज समस्या, वाढीव बिल,फॉल्टीमीटरबाबत स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये, वीज गेल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून फोन उचलले जात नाहीत,अशा समस्यांबाबत रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या चेंढरे येथील कार्यालयात मंगळवारी (ता. २०) शेतकरी कामगार पक्षाच्या प्रदेश महिला आघाडी प्रमुख ॲड.मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अतिरिक्त अभियंता प्रशांत बानाईत कार्यकारी यांची भेट घेत नागरिकांच्या समस्या मांडत लेखी निवेदन सादर केले आहे.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,गेले अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. यांचे मार्फत शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरीकांना सातत्याने स्मार्ट विदयूत मिटर सक्तीचे करून घेणेबाबत सांगितले जात आहे. सद्द्य स्थितीत आपले कंपनी कडून इलेक्ट्रॉनीक मिटर कार्यरत आहेत सदर मिटर हे सुरळीत पणे चालू आहेत असे असताना ग्राहकांना सदर मिटर ऐवजी स्मार्ट मिटर लावणे सक्तीचे का केले जात आहे या बाबत सर्व सामान्य जनता / ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची सदर स्मार्ट मीटर घेणे बाबतची भूमिका संशयास्पद आहे. या मिटर मुळे सर्व सामान्य नागरीकांचा ग्राहकांचा काडीमात्र फायदा नाही उलटपक्षी सदर स्मार्ट मीटर बसविण्यात आल्या नंतर कोणत्याही नैसर्गीक अथवा संभाव्य आपत्तीने तो निकामी झाल्यास त्याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य ग्राहकाला सोसावा लागणार आहे. सदर मीटर लावताना एल.सी.पी. हे जोडणी करून त्याचे स्वतंत्र आकारणी रू. एक हजार आठशे वसूल केले जाणार आहेत. याचा देखील भार सर्वसामान्य नागरीकांवर पडणार आहे. या बाबत कंपनीची भूमिका सर्वसामान्य ग्राहकांच्या अहिताची व लूटमारीची आहे.
महावितरणच्या भोंगळ कारभारावर टीका केली. अलिबाग शहर सहित तालुक्यातील अनेक भागांत तासन्तास वीजपुरवठा खंडित होतो. त्यातच वाढीव वीजबिल आणि अनावश्यक डिपॉझिट नागरिकांना नाहक त्रास देत आहेत, फॉल्टीमीटरच्या नावाने खाली नागरिकांना स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती केली जात आहे, स्मार्ट मीटरमुळे बिल वाढते, गोपनीयतेचा भंग होतो, जबरदस्ती केली जाते, काही ठिकाणी स्मार्ट मीटरच्या सक्ती विरोधात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन झाली आहेत. या सर्व ग्राहकांच्या तक्रारींचा विचार करून २०२४ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य ग्राहकांसाठी (घरगुती आणि लहान व्यावसायिक) स्मार्ट मीटर अनिवार्य केले जाणार नाहीत, असे म्हटले होते. मग आता महावितरणकडून स्मार्ट मीटरची सक्ती का केली जात आहे,?असा संतप्त सवाल नागरिकांच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आला.
असे अलिबाग शहर प्रमुख अनिल चोपडा यांनी सांगितले. शेतकरी कामगार पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी आणि हितासाठी लढत आहे, त्याच भुमिकेतून शेतकरी कामगार पक्ष अलिबाग तालूका आणि आलिबाग शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. यांनी ठरविलेल्या सक्तीच्या स्मार्ट मिटर धोरणास जोरदार विरोध करत आहोत.9 शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी ठोसपणे आपले कंपनीचे सक्तीचे स्मार्ट मिटर धोरणास तीव्र विरोध दर्शवत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी महिला आघाडी प्रमुख ॲड.मानसी म्हात्रे, अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, अलिबाग तालुका कार्यालयीन चिटणीस तुषार प्रधान, अलिबाग शहर प्रमुख अनिल चोपडा,सह शहर प्रमुख तुषार (मुन्ना) वाईकर, अलिबाग महिला शहर प्रमुख ॲड. नीलम हजारे, सह शहर प्रमुख अश्विनी ठोसर, अलिबाग शहर पुरोगामी प्रमुख कपिल अनुभवने, अलिबाग शहर सांस्कृतिक सेल प्रमुख नंदकुमार तळकर आदी उपस्थित होते…