महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे फेरबदल होताना दिसत आहेत… शिवसेना फुटून शिवसेनेमध्ये दोन गट तयार झाले… तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटून दोन गट झाले आहेत.राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली… यापूर्वीही रवींद्र चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी काम पाहिलं होतं…राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता.. यावेळी त्यांच्या समवेत असंख्य कार्यकर्तेही उपस्थित होते… मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांना रायगड जिल्हा अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली असून पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने पार पाडेल असेही रवींद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले. जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाण सर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवेळी प्रदेशाध्यक्ष, आमदार, सचिव, पक्षाचे उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, अनेक तालुकाध्यक्ष छोटे-मोठे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.