रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
मोहपाडा येथील आमंत्रण हॉटेलजवळ असलेल्या महाकाय पिंपळ वृक्षाची भलीमोठी फांदी गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक पडल्याने यात दुचाकी वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे…
मोहोपाडा येथील आमंत्रण हॉटेल शेजारी इको (काळी पिवळी)गाडीचा थांबा असून या परिसरात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते…गुरुवारी वादळवारा पाऊस नसतानाही अचानक आमंत्रण हॉटेल शेजारील पिंपळाची भली मोठी फांदी अचानक कोसळल्याने दुचाकी वाहनांचे नुकसान झाले तसेच इंटरनेट केबल व विद्युत वायर तुटून पडल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचे वृत्त रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांना समजताच त्यांनी तात्काळ महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण केले.अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास एक ते दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर येण्या-जाण्याचा मार्ग सुरळीत केला…यात इंटरनेट केबल तुटून पडल्यामुळे त्यांचे खूप मोठे नुकसान झाले…त्यामुळे मोहोपाडा परिसरात इंटरनेट सुविधा बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला.
मोहोपाडा येथील महावितरण कंपनीचा मनमानी व गलथान कारभाराविषयी सर्वसामान्य नागरिकांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली.पावसाळ्यापूर्वी महावितरण कंपनीने रस्त्यावरील अडचणीचे ठरत असलेल्या झाडे व फांद्या कापणे,छाटणे गरजेचे असतानाही महावितरण कंपनी हेतू पुरस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.लोड शेडिंगच्या नावाखाली तासनतास वीज पुरवठा खंडित केला जातो…मात्र रस्त्यावरील अडचणीचे ठरत असलेले झाड त्यांच्या फांद्या तसेच धोकादायक विद्युत पूल यावर महावितरण कंपनी कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना करत नाही…असा नाराजीचा सूर सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे…गतवर्षी आमंत्रण हॉटेल जवळच या झाडाची फांदी पडून एका चारचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.पुन्हा यावर्षी गुरुवारी जवळपास पाच दुचाकी गाडींचे नुकसान झाले यात सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.अशा गंभीर समस्यांबाबत महावितरण कंपनीला जाग कधी येणार? असा संतप्त सवालही या निमित्ताने व्यक्त होत आहे…