यशवंत पाटील यांचे पिण्याच्या पाण्याचे आंदोलन यशस्वी… मोर्चा व आमरण उपोषणाची प्रशासनाने घेतली गंभीर दखल…

0
10

मुरुड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील वालवटी गावच्या पिण्याच्या पाणी योजनेतील भ्रष्टाचार प्रकरण प्रचंड गाजले.काल सर्वधर्मीय मोर्चा व सुरु झालेल्या आमरण उपोषणाची दखल पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने त्वरित घेऊन पाणी पुरवठा समिती अध्यक्ष व आंदोलकांचे नेते यशवंत पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या.तहसीलदार राजेश तंवर, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर,बिडीओ यांनी त्यांना फळांचा रस देऊन उपोषण संपवले.

जिल्हा परिषदकडून मिळालेल्या पत्राचे जाहीर वाचन करून ग्रामसभा व तदनंतर ग्रामस्थांच्या मनाजोगे योजनेचे काम झाले नसल्यास पुन्हा अधिक उग्र आंदोलन करू असा इशारा देऊन तात्पुरते आंदोलन स्थगित करत असल्याचे यशवंत पाटील म्हणाले. त्यांच्यासह त्यांचे सहकारी उपाध्यक्ष इंतिखाब मुकरी,सेक्रेटरी शब्बीर खतीब,शौखत नाखवाजी, शैलेश पाटील, नजीर नाखवाजी यांनी देखील उपोषण स्थगित केले.