चौदा गाव शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
राज्यातील महायुती सरकारकडून विविध जिल्ह्यात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला.त्यानंतर,भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ रविवार दि.२५ मे रोजी कल्याण ग्रामीण मंडळ ५ यांच्यावतीने तिरंगा यात्रा काढण्यात आली…पिंपरी ते दहिसर मोरीपर्यंत तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते…या तिरंगा रॅलीत मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते…
या तिरंगा यात्रेत नवनिर्वाचित कल्याण जिल्हा भाजपा अध्यक्ष नंदु परब,ओबीसी कल्याण जिल्हा भाजपा अध्यक्ष लक्ष्मण दादा पाटील,कल्याण ग्रामीण मंडळ ५ भाजपा अध्यक्ष सुनील म्हसकर,ओबीसी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चेतन शेठ पाटील, कल्याण जिल्हा भाजपा उपाध्यक्ष गुरुनाथ वसंत पाटील, कल्याण जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस गुरुनाथ पाटील, डोंबिवली ग्रामीण मंडळ भाजपा सरचिटणीस रतन पुजारी, बाबुराव मुंढे,रामनाथ मुकादम,दत्ता पाटील,प्रदीप साळुंखे, सचिन वालिलकर,संजय भोईर,सुशांत जाधव,राजेश शेलार,प्रकाश जाधव,अक्षय पाटील ,कृष्णा म्हसकर, मनोज म्हसकर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते…