रोह्यामध्ये रेशन धान्य पुरवठ्याबाबत सावळा गोंधळ सुरू?… रोहेकर नागरिकांसह रास्त भाव धान्य दुकानदार त्रस्त…

0
16

रोहा शिवसत्ता टाइम्स ( समीर बामुगडे ):- 

गोर गरीब जनतेला तीन महिने रेशन मिळत नसल्याची दुर्दैवी घटना रोह्यामध्ये घडली आहे. गरिबांवर उपाशी राहण्याची वेळ आली असून रोहा पुरवठा विभागावर प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. रोहा तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकार रेशन धान्य दुकानांमार्फत पात्र लाभार्थी रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करुन देत आहे… महाराष्ट्रात कोणताही गोरगरीब व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी सदर योजना सुरू करण्यात आली आहे…परंतु मार्च एप्रिल मे महिन्यात रेशन वरील धान्य मिळाले नसल्याने उपाशी राहण्याची वेळ आली आहे…मे महिन्याचे धान्य काही ठिकाणी अद्याप वाटप झाले नाही.  पुरवठा विभाग रास्त भाव रेशन दुकानदारांना साठ ,सत्तर टक्केच रेशन धान्य देत असल्याने अन्य लाभार्थ्यांनी उपाशी राहायचे काय? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.मार्च महिण्याचा 27 दुकानात अद्याप धान्य पोचले नाही…हे धान्य गेले कुठे यांचा खुलासा रोहा पुरवठा निरीक्षण अधिकारी यांना द्यावा.ग्रामीण भागात लाईट नसते, कधी कधी पॉस मशीन खराबी होते,नेट जातो, काहींचा थम उठत नाही, त्यांना रेशन धान्य देण्याची तरतूद आहे. ऑफलाइन,ऑनलाईन पद्धत सुरू करण्यात आली आहे.जेणेकरुन लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे.

रोहा पुरवठा निरीक्षण अधिकारी हेमलता कुसुंगे कामावर रुजू झाल्यापासून विविध समस्या निर्माण होत आहेत. काही ठिकाणी सडलेले ,कीड पडलेले अन्नधान्य वाटप करण्यात येते, तसेच  नागोठणे येथील रेशन दुकानदार लाभार्थ्यांना मोफत असणारे धान्य पैसे घेऊन विकत असल्याचा प्रकार समोर आला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तब्बल पाच महिन्यांनी या प्रकरणाचा पंचनामा करण्यात आला. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा प्रकार आहे. रोहा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थी रेशन कार्ड धारकांचे अगोदर थम घेऊन ऑनलाईन नोंद करण्यातचे तोंडी आदेश दिले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून रेशनधान्य घेण्या अगोदर थम देण्यास नकार देत आहेत.

दोन तीन महिन्यांचे रेशन न मिळाल्याने नागरिक रास्त भाव धान्य दुकानदारांकडे जाऊन रेशन धान्याची मागणी करत आहेत.अरेरावीची भाषा करत असल्याने काही रास्त भाव दुकानदार राजीनामा देण्याच्या मानसिकतेत आहेत. पुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे पात्र लाभार्थी मात्र धान्यांपासून वंचित राहत आहेत. रास्त भाव धान्य दुकानदारांकडे नागरिक तगादा लावत असल्याने दुकानदार वैतागले आहेत, रेशन धान्य दुकान बंद करण्याच्या मार्गावर आहेत. नागरिकांसाठी 100 टक्के येणारा धान्य, दुकानदारांना फक्त 70/80 टक्केच पुरवठा केला जात आहे. 20/30 टक्के रेशन जातोय कुठे?ही एक कमाल आहे ? दर महिन्याला कमाल होत असल्याची चर्चा सुरू आहे . माणगाव तालुक्यात रेशन दुकानात मार्च एप्रिल महिन्याचा 100 टक्के रेशन देण्यात आला. मग रोहा शहरावर अन्याय का?असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आमच्या हक्काचे 100 टक्के रेशन मिळावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.