अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
श्रीवर्धन व अलिबाग तालुक्यातील मत्स्यव्यवसायाशी संबंधित काही प्रलंबित प्रश्नांवरती चित्रा पाटील व माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्रालयाच्या जनता दरबारात मंत्री नितेश राणे यांच्याशी सविस्तर चर्चा केली…
या चर्चेदरम्यान मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, तसेच या भागात बंदर उभारणीसाठी आवश्यक पावले उचलावीत व खाडीतील गाळ काढण्यासाठी तसेच स्थानिक मच्छिमार लोकांच्या सबसिडीचा विषय यांसारख्या अनेक मुद्यावर सखोल चर्चा करण्यात आली… या मुद्द्यांवर माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला,ज्यामुळे या क्षेत्रातील विकासाला नक्कीच गती मिळेल अशी आशा आहे…त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन कामाला लागण्याचे आदेश दिले… मत्स्यव्यसायाशी संबंधित किंवा खाडी आणि बंदराशी असलेले प्रश्न देखील लवकर सुटतील अशी आम्हाला आशा आहे..
रायगड जिल्हा हा कोस्टल विभाग म्हणून ओळखला जातो…याच कोस्टल विभागाला स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील या मत्स्यव्यवसाय व विकास बंदरे म्हणून मंत्री होत्या…आणि त्याच्यानंतर आता महायुती मध्ये ज्ञात असलेले नितेश राणे यांना हे पद आता मिळालेलं आहे…अलिबाग तालुक्यातील नव्हे तर श्रीवर्धन पर्यतच्या मच्छिमारांचे जे काही प्रश्न होते…या सर्व प्रश्नांना घेऊन निलेशजी राणे यांची भेट घेतली होती…त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळात मस्त्यव्यासाय किंवा खाडी आणि बंदराशी असलेले प्रश्न आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून लवकरच सुटतील … असे चित्रा पाटील यांनी सांगितले…