महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
कालच स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपतींचा शिवराज्याभिषेक तारखेप्रमाणे मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी बोलत असताना छत्रपती संभाजी राजे यांनी अनेक मुद्द्यांना हात घालत छत्रपती शिवरायांचे वास्तव्य असलेले पुरावळे सापडले असून या ठिकाणी छत्रपती शिवरायांची राजसदर होती आणि या राज सदरेचे पुन्हा पुनर्वसन व्हावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी बोलत असताना छत्रपती संभाजी राजे यांनी जर का ही राजसदर पुनर्बांधणीचे काम शासनाला होणार नसेल तर ते आम्ही पूर्ण करू अशी मागणी केली होती आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना छत्रपतींचा शिवराज्याभिषेक हा एकच व्हावा आणि तो तारखेनुसार व्हावा असे उद्गार काढले होते यावर आज राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री शिवभक्त आमदार नामदार भरतशेठ गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा हा आम्ही मोजक्या शिवभक्तांसह 32 वर्षांपूर्वी सुरू केला आहे नंतर याच राज्याभिषेक सोहळ्याला संभाजी महाराज छत्रपती यांना निमंत्रित केले होते मात्र काही वर्षानंतर छत्रपती संभाजी यांनी हा राज्याभिषेक सोहळा तारखेप्रमाणे करण्यात यावा अशी मागणी केली होती मात्र हिंदू धर्मातील सणवार हे तिथीप्रमाणे साजरे केले जातात त्यामुळे आपण राज्याभिषेक तिथीप्रमाणेच करावा असे सांगण्यात आले मात्र छत्रपतींनी राज्याभिषेक सोहळा तारखेप्रमाणे साजरा करण्यास सुरुवात केली आज दोन्ही राज्याभिषेक सोहळ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त येत आहेत आणि तारखेप्रमाणे होत असणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याला देखील शासन सर्वतोपरी मदत करत आहे त्यामुळे राज्याभिषेक सोहळा एक करावा ही मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी एक प्रकारे मोडीत काढली आहे तर छत्रपतींचे दोन्ही राज्याभिषेक सोहळे झाल्यास आम्हाला कोणतीही हरकत नाही असे देखील मंत्री भरत शेठ गोगावले यांनी सांगितले आहे तर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या राजसद्रेवरील भाषणात छत्रपतींची राजसदर पुनर्बांधणी करावी अशी मागणी करत जर शासनाला हे काम होत नसेल तर त्यांनी ते आमच्या हातात द्यावे आम्ही ते काम पूर्ण करू अशी मागणी केली होती यावर बोलत असताना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सांगितले की छत्रपती शिवरायांची राजसदर ही शासनामार्फतच बांधली जाईल आणि त्याच्यासाठी शासन कटीबद्ध आहे त्यासाठी पुरातत्व विभागाकडे आम्ही जाऊन ज्या अडीअडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करू असे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सांगितले असून ९ जुन ला तिथीप्रमाणे साजरा होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातुन मोठ्या संख्येने शिवभक्तांनी आपली उपस्थिती दर्शवावी असे आव्हान देखील केले आहे…