रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
रायगडच्या सुधागड तालुक्यातील मौजे भैरव येथील शेतकरी चिंतामण पवार यांच्यावर आपल्याच मालकी हक्काच्या जमिनीसाठी तब्बल पाचवेळा आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे…उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही मागण्यांच्या अनुषंगाने कोणताही तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच असून शेतकरी चिंतामण पवार यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने बळ दिले आहे.वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा अध्यक्ष दिपकभाऊ गायकवाड व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते पवार यांची भेट घेतली व पीडित शेतकऱ्याला योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक उग्र करणार असल्याचा इशारा दिला,शिवाय उपोषणकर्ते चिंतामण पवार यांची तब्येत खालावल्यास त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य व अन्य चार कार्यकर्ते आमरण उपोषणास बसवणार असल्याचा इशारा देखील जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी दिला…वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार, बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.त्यामुळे या आंदोलनाला मोठे बळ मिळाले असून हे आंदोलन येत्या काळात अधिक चिघळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.उपोषणकर्ते हे देखील आपल्या मागण्यांवर ठाम असून जिव गेला तरी मागे हटणार नाही…होणाऱ्या परिणामास प्रशासन व संबंधित विकासक जबाबदार असल्याचा इशारा उपोषणकर्ते शेतकरी पवार यांनी दिला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपकभाऊ गायकवाड,महासचिव धर्मेंद्र मोरे,जिल्हा संघटक राहुल गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत साळुंके, जिल्हा सचिव अशोक वाघमारे,सुधागड तालुका अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, महासचिव आनंद जाधव, संघटक प्रवीण गायकवाड, कर्जत शहर अध्यक्ष लोकेश यादव ,प्रशांत गायकवाड,आदींसह पदाधिकारी तसेच बहुजन विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड,आरपीआय खोपोली शहर अध्यक्ष नितीन वाघमारे आदींसह विविध सामाजिक व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.