वाहतूक सुरक्षेला झुंज… लोखंडी सळ्यांचा निष्काळजी वाहतूक प्रकार अपघातास कारणीभूत…

0
13

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव शहरात रविवारी दि. १५ जून दुपारी १:१९ वा.एक किरकोळ अपघात घडला,मात्र यात मोठा जीवितहानीचा धोका थोडक्यात टळला. अपघात झालेल्या घटनेने वाहतूक सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष किती गंभीर ठरू शकते,याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे. दुपारी माणगाव शहरातील मुंबई गोवा महामार्ग मोर्बा रोड कॉर्नर येते एक पिक अप चार चाकी वाहन पुणे दिघी राज्य महामार्ग अर्थातच श्रीवर्धन चा वळणावर लोखंडी सळ्यांनी भरलेला व्हॅन डावीकडे वळत असताना, त्याचवेळी एक रिकामी टमटम गाडी निजामपूर रोड कॉर्नर दिशेने जात असताना पिकअपच्या मागचा लोखंडी सळ्या धडकली. या धडकेत टमटमच्या समोरील काचा पूर्णतः फुटल्या अन गाडीत व रस्त्यावर अक्षरशः काचेच खच पडले मात्र सुदैवाने या टमटममध्ये प्रवासी नव्हते, कारण काही क्षणांपूर्वीच त्यांना उतरवण्यात आले होते. प्रवासी असते, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. या दरम्यान धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे याच ठिकाणी वाहतूक पोलीस उपस्थित होते, मोठा आवाज होताच अचानक मागे वळून पाहिले की नेमकं काय घडल? तो पर्यंत अपघातामुळे रस्त्यावर काचेचे तुकडे पसरले, ते लगेचच सामाजिक कार्यात सतत धावून जाणारा येतील भाजीपाला विक्रेते सचिन मांजरे यांनी वाहतूक पोलीस यांच्या विनंतीने झाडू आणि सुपाचा साहाय्याने साफ केले. काही वेळात दोन्ही वाहने बाजूला करण्यात आली, आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे एक गंभीर मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे, कि वाहतुकीचे नियम आणि त्याचे उल्लंघन. वाहतूक सुरक्षेच्या नियमानुसार, लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सळ्यांच्या टोकांना दिवसा उज्ज्वल लाल रंगाचा कापड आणि रात्री लाल दिवा लावणे बंधनकारक आहे. मात्र माणगाव विभागात हे नियम पाळले जात नसल्याचे आढळून आले आहे. अनेक वाहनचालक, मालक व लोखंड विक्रेते अशा सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. आमच्या प्रतिनिधीने अनेक असे फोटो घेतले आहेत, जे या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. यामुळे केवळ अपघातच नाही तर जीवितहानीचा धोका देखील निर्माण होतो. त्यामुळे वाहन चालक, मालमत्ता विक्रेते आणि वाहन मालक यांच्यावर याची जबाबदारी निश्चित करणे अत्यावश्यक झाले आहे. वाहतूक पोलिसांनी या प्रकरणी कडक पावले उचलून नियमांचे पालन सक्तीने करावे,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. ही घटना म्हणजे केवळ एक इशारा नसून भविष्यातील संभाव्य दुर्घटनांना रोखण्यासाठीचा धडा आहे.वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अशा अपघातांना निश्चितच आळा घालता येईल.