रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्ह्यात सलग दोन दिवस ढगफुटीप्रमाणे मुसळधार पाऊस कोसळतोय, सखोल भागात ठिकठिकाणी पाणी साचलेय. मुसळधार पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील रोहा मधील कुंडलिका खालापूर मधील पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे तर तिकडे नागोठणे मधील आंबा नदीने देखील इशारा पातळी गाठली आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन सुद्धा सतर्क झालं आहे.