अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन) :-
मच्छीमार होडया तसेच छोटया मोठया बार्ज यांना कुंडलिका समुद्रा मार्गे प्रवास करताना, रेवदंडा पुलानजीक बुडालेली बार्ज, बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे… रेवदंडा पुलानजीक काही वर्षापासून बुडालेली बार्ज समुद्राच्या पाण्यातून बाहेर न काढल्याने तेथून जा-ये करणारा इतर लहान मोठया बोटी, बार्ज यांना धोकादायक ठरत होती…. याबद्दल मच्छीमार व्यावसायीकांनी नाराजी व्यक्त केली होती… सदर बार्ज समुद्र भरतीच्या वेळी पुर्णतः बुडत असल्याने रेवदंडा समुद्र किनारी कुंडलिका समुद्र खाडीत ये-जा करत असलेल्या लहान मोठया बोटी, बार्ज यांच्या निदर्शनास येत नव्हती… परिणामी पाण्यातील बुडालेल्या बार्जला धडक बसून अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती….
गेले अनेक वर्षे संबंधितांनी सदर बुडालेली बार्ज काढण्याची कोणतीही खबरदारी घेतली नव्हती…. त्यामुळे येथून जा-ये करताना बोटी, बार्ज यांना सावधानता बाळगावी लागत असे… तसेच कुंडलिका समुद्र खाडीत नवीन बोट अथवा बार्ज येथून जा-ये करत असल्यास बुडालेली बार्ज भरतीचे वेळी दिसत नसल्याने व बुडालेल्या बार्ज बद्दल माहिती नसल्याने अपघाताची शक्यता होतीच….
याबाबत रेवदंडा बंदर निरीक्षक सतीश देशमुख यांच्याशी संपर्क केला असता, सदर समुद्रात बुडालेली बार्ज काढून घेण्याबाबत संबंधित बार्ज मालकास सूचना केली आहे…. मात्र याबाबत बार्ज मालकांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य दिले नसल्याचे म्हटले होते…. मात्र संबंधित बार्ज मालकांनी सदर बार्ज काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याने स्थानिक मच्छीमार व्यावसायीकांनी समाधान व्यक्त केले आहे…