रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदाचा वाद काही केल्या संपत नाही. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आदिती तटकरे यांचा उल्लेख मनातला पालकमंत्री असा केला असून यावर बोलताना या जिल्ह्यात मनातला पालकमंत्री भरतशेठ असल्याचे उत्तर भरत गोगावले यांनी दिल आहे. महायुतीच्या काळात जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक विकास झाल्याचे सांगताना हे कोणी नाकारू शकत नाही, त्यांनी जशी विनंती केली तशी आम्ही सुध्दा विनंती केली असल्याचे सांगताना कोणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विकास थांबवु शकत नाही. कोण म्हणतय आम्ही मनातले आहोत मग आम्ही काय ध्यानातले आहोत का ? असा सवाल करीत कमीत कमी 75 टक्के लोकांच्या मनात भरतशेठ आहे कोणाला नाकारता येणार नाही अस गोगावले म्हणाले.