रेवदंडा आगरकोट किल्ल्यावर अपघात; पुण्याच्या पर्यटक महिला गंभीर जखमी

0
16

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

पुरातत्व खात्याच्या हलगर्जी पणामुळे रायगड जिल्हा सहित महाराष्ट्र मधील किल्ले यांची अवस्था ही बिकट झाली आहे.तर काही भू किल्ल्याचे बुरुज हे ढासळत आहे. अशाच एक प्रकार रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील आगरकोट किल्ला येथे पर्यटनासाठी आलेल्या महिला पर्यटक यांच्या अंगावर  बुरुज ढासळून महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी झालेली महिला ही पर्यटनासाठी पुणे येथून आली असून तिचे नाव अबोली श्रीकांत देशपांडे (वय ५३)  असे आहे.

स्वातंत्र्य दिन, दही हंडी याची सुट्टी जोडून रविवारची अशी तीन दिवसाची सुट्टी एकत्रित आल्याने पुणे मुंबई येथील नागरिक पर्यटनासाठी रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आले आहेत. पुणे येथून अबोली श्रीकांत देशपांडे हे कुटुंबासोबत पर्यटनासाठी अलीबाग तालुक्यात आले होते. ते त्यांचे वास्तव्य नागाव येथे होते. आज  अबोली देशपांडे आणि त्यांचे पती श्रीकांत देशपांडे हे पर्यटनासाठी अलिबाग तालुक्यातील जग प्रसिद्ध असलेल्या रेवदंडा येथील आगरकोट किल्ल्यात पर्यटनासाठी आले होते.

नागाव येथे गोविंदाच्या सुट्टीनिमित्त आलेले पुणे येथील एक विवाहित जोडपे रविवारी रेवदंडा येथील ऐतिहासिक आगरकोट किल्ला व प्रसिद्ध सातखणी बुरुज पाहण्यासाठी गेले होते. देशपांडे दांपत्य हे आगर कोट किल्ल्याची सफर करत असताना ते सातखणी बुरुजाजवळ पोहोचले आणि दुर्दैवी या ठिकाणी दुर्देवी घडली. फिरून झाल्यावर बुरुजाजवळ ठेवलेली बॅग आणण्यासाठी गेल्याच क्षणी बुरुजाचा सिमेंटचा काही भाग अचानक ढासळून पुणे येथील  अबोली श्रीकांत देशपांडे (वय ५३) यांच्या डोक्यावर कोसळला. यावेळी या ठिकाणी त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढे अलिबाग येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आगरकोट मधील या घटनेनंतर आगरकोट किल्ला दुर्घटनेनंतर  स्थानिक नागरिक व पर्यटकांमध्ये पुरातत्व विभागाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

“नकाशावरून किल्ला गायब करण्याचा डाव” आदळला.बुरुजाखाली रक्त… आणि सरकार गप्प ?आगरकोट किल्ला संरक्षणासाठी नागरिकांची संतप्त मागणी. रायगड पुरातत्त्व विभागावर प्रश्नचिन्ह या घटनेमुळे ऐतिहासिक वारशाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगरकोट किल्ला व सातखणी बुरुज अत्यंत जीर्णावस्थेत असून, पर्यटकांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत आहे.”तज्ज्ञांचे मत आहे की,”तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून बुरुजांची दुरुस्ती सुरू करणे आवश्यक आहे. धोकादायक ठिकाणी इशारा फलक (Danger Boards) लावणे सक्तीचे असावे.पर्यटकांसाठी सुरक्षितता उपाययोजना करणे विलंब न लावता सुरू कराव्यात.

पुरातत्व विभाग, महसूल खाते व राज्य शासन जाणूनबुजून या किल्ल्याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा रंगली आहे. काहींच्या मते,”आगरकोट किल्ल्याचे जतन न करता, त्याला नकाशावरून आणि गुगलवरून गायब करण्याचा डाव सरकारी अधिकाऱ्यांचा आहे. पैशाच्या हव्यासापोटी हा किल्ला बिल्डर लॉबीकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

केंद्र-राज्य सरकारला मागणी पर्यटक व स्थानिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय पुरातत्त्व विभाग, राज्यपाल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच मंत्री आशिष शेलार यांच्याकडे तातडीने लक्ष घालून इतिहासकालीन आगरकोट किल्ल्याचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे.