रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे सुनील तटकरेंचे पाय धरून मोठे झाले की लोकसभेला तटकरे… ?असा तिखट सवाल शिवसेनेचे (शिंदे गटाचे) जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर टीका करत दळवींनी तटकरेंच्या पायाला हात लावून मोठे झाले अशी विधाने केली होती.तसेच अलिबागची नगरपालिका नीट सांभाळा,रस्त्यांसाठी लोकांना आंदोलन का करावं लागतं?असा प्रश्नही देशमुख यांनी उपस्थित केला होता. अलिबागला येण्याची भाषा करणाऱ्यांच्या स्वागतासाठी महाप्रसादाची व्यवस्था करून ठेवली आहे.हिंमत असेल तर देशमुखांनी अलिबागला येऊन दाखवावे.केणी यांनी पुढे टीका करताना म्हटले की,देशमुख आता काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेत.त्यांनी आधी तटकरे कुटुंबाबद्दल काय बोलले होते, ते एकदा आठवून बघावं.जिल्ह्यात डोंबाऱ्याचा खेळ सुनील तटकरेच करत आले आहेत. तटकरेंचे पाय धरून आमदार दळवी मोठे झाले नाहीत,तर लोकसभा निवडणुकीत तटकरेंना निवडून आणण्याचे काम दळवी आणि शिवसेनेने केले.त्या वेळी खा.सुनील तटकरे हेच आ. दळवी यांच्या घरी फेऱ्या मारत,मताधिक्य मिळवण्यासाठी विनंत्या करत होते.शेवटी केणी यांनी देशमुख यांना इशारा दिला…तुम्ही टीका करत आहात ती थांबवा…अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल…