रोहा/माणगाव शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव) सह (दिपक दपके):-
वाढत्या अपघातांमुळे मुंबई-गोवा महामार्गावरून दुचाकीने प्रवास करायचा की नाही ?… असे सवाल लोकांच्या मनात येत आहेत…असाच एक अपघात माणगावपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गारळ गावाच्या हद्दीत झाला…सुनेला घेऊन जाणाऱ्या सासऱ्याच्या गाडीला ट्रकने अलगद उडविले…त्यात सुनेचा मृत्यू झाला…आणि दोन हसत्या-खेळत्या घरांवर गणपती सणाला काही दिवसच राहिले असताना दुःखाचा डोंगर कोसळला…शनिवार दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८:४५ वाजता हा अपघात झाला…महाडकडून कोलाडकडे टीव्हीएस ज्युपीटर स्कुटर.क्र एम.एच ०६ सी.जे ३७०४ वरून वसंत भिसे हे आपल्या सूनेला मागे बसवून घेऊन येत होते… यावेळी महामार्गावर गारळ गावाच्या हद्दीत इनामदार हा इसम ट्रक क्र.एम.एच ०६ ए.क्यु ५७९३ हा अतिवेगाने,बेदारकारपणे चालवत होता… या ट्रकने स्कुटीला मागुन जोरदार ठोकर मारली… अपघातात वसंत भिसे हे गंभीर जखमी झाले असून दुचाकीवर मागे बसलेली त्यांची सून सोनाली भिसे जागीच मृत झाली…भिसे कुटुंब हे महाड येथे राहते… तर सोनाली भिसे हिचे माहेर नागोठणे-वांगणी,तालुका रोहा येथे आहे…