पहिल्या यादीतच महाडचे आमदार भरत गोगावलेंचे नाव…कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचा विश्वास…

0
53

 रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

राज्यात महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीतच महाडचे आमदार भरत गोगावले यांचे नाव असेल, असा विश्वास कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला आहे…रायगडचे पालकमंत्री देखील तेच असतील, असेही ते म्हणाले आहे…शिंदे सरकारमध्ये गोगावले यांची संधी थोडक्यात हुकली होती. रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे आमदार विजयी झाले आहे…प्रशांत ठाकूर,आणि भरत गोगावले सलग चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत…तर अदिती तटकरे दुसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत…या तिघांनाही राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल,अशी चर्चा जिल्ह्यात सुरु आहे…गेल्या महायुती सरकारमध्ये रायगड जिल्ह्यातून शिवसेना आणि भाजपच्या एकाही आमदाराची मंत्रीपदावर वर्णी लागली नव्हती. मात्र त्याचवेळी पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले होते…त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर होता…मंत्रीपदाच्या यादीत भरत गोगावले यांचे नाव वेटींगवरच राहीले होते…आता नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये शिवसेनेकडून आमदार भरत गोगावले यांना शिवसेनेच्या कोट्यातून पहिल्या यादीत मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शिवसेनेला अपेक्षा आहे…कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही तसा विश्वास व्यक्त केला आहे…गोगावले महाड मतदारसंघातून विधानसभेवर चौथ्यांदा निवडून आले आहेत. दरम्यान, शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी अदिती तटकरे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत गद्दारी केल्याचा आरोप केला आहे…महायुती असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत मतदारसंघात अपक्ष उमेदवार दिला…छुप्या पद्धतीने मला पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचेही थोरवे यांनी म्हटले आहे…तर मंत्री कोणी व्हायचे हे पक्षाचे नेते ठरवतात, काठावर पास झालेले आमदार ठरवत नाहीत,असे म्हणत अदिती तटकरे यांनी थोरवे यांना उत्तर दिले आहे…