रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
रायगड जिल्ह्यासहित महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अलिबाग तालुक्यातील चौल भोवाळे पर्वत निवासी श्री दत्त मंदिरात चांदी चोरी केल्याची घटना घडली होती…17 डिसेंबर 2022 रोजी चोरी करुन मूर्तींच्या मागे लावलेली सुमारे 40 किलो चांदी लंपास केली होती. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले तरी अजूनपर्यंत रायगड पोलिस तपास करीत आहेत. मात्र दत्त मंदिरातील चोरीचा तपास लागलेला नसल्याने रेवदंडा पोलिस सह रायगड पोलिसांच्या तपासाबाबत भक्तांकडून नाराजी उघडपणे व्यक्त होत आहे.
अलिबाग तालुक्यातील चौल भोवाळे पर्वत निवासी श्री दत्त मंदिरात श्री दत्त मूर्तीच्या मागे भिंतीला लावलेली ४० किलो चांदी चोरट्याने लंपास केली होती.चोरी करणारा चोर हा सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. या चोरट्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी हा गुन्हा दाखल केला होता. सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, तत्कालीन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, रेवदंडा पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. सीसीटिव्ही चोरटा कैद झाल्याने लवकरच तपास लागला जाईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी त्यावेळी व्यक्त केला होता.
सदर चोरीचा तपास ह रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला होता. दत्त मंदिर चोरीचा तपास हे रायगड पोलिसाना आव्हान बनले आहे. त्यांनर रायगड जिल्ह्यातील दोन महत्वाच्या मंदिराची चोरी काही दिवसातच तपास पूर्ण करीत आरोपींना गजाआड करण्यात यश प्राप्त झाले होते. दत्त चोरी प्रकरणी एका संशिताला रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र चोरीच्या वेळ आणि सदर संशियताचे ठिकाण यामध्ये भिन्नता आढळून आल्याने त्यास सोडणे भाग पडले.
चौल भोवाळे पर्वत निवासी श्री दत्त मंदिर हे प्रसिद्ध आहे. डिसेंबर महिन्यात दरवर्षी मोठी यात्रा याठिकाणी भरत असते. ७ डिसेंबर २०२२ ते ११ डिसेंबर २०२२ दरम्यान अशी पाच दिवस यात्रा संपन्न झाली होती. त्यानंतर चारच दिवसांनी शुक्रवारी १६ डिसेंबर २०२२ रोजी चोरट्याने मंदिरातील चांदीवर डल्ला मारला आहे. त्यामुळे एकच खळबळ तालुक्यात माजली होती. शुक्रवारी १६ डिसेंबर २०२२ रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
चौल-भोवाळे येथील पर्वतनिवासी दत्त मंदिरामध्ये अज्ञात चोरट्यांनी 17 डिसेंबर 2022 रोजी चोरी करुन मूर्तींच्या मागे लावलेली सुमारे 40 किलो चांदी लंपास केली होती. 11 डिसेंबरला येथील यात्रा संपल्यानंतर ही चोरी झाली होती. या घटनेची नोंद मंदिरात असणाऱ्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात झालेली आहे. तरीही दोन वर्ष पूर्ण झाले तरीही तपास लावण्यात रायगड पोलिसाना अपयश आले असल्याने श्री दत्त भक्त यांच्यामध्ये नाराजीची भावना पसरली आहे.
तदनंतर रेवदंडा पोलिस स्टेशन हद्दीतील थेरोंडा खंडेरावपाडयातील भरवस्तीत असलेल्या खंडोबा मंदिरातील देव्हारातील पाच किलो तिनशे साठ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मुर्ती चोरटयांनी 17 मे 2023 रोजी रात्रीचे समयी चोरीस नेल्याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाणे येथे अज्ञात चोरटयांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या चोरीचा या गुन्ह्यातील महेश नंदकुमार चायनाखवा (वय 38 वर्षे, रा. आगल्याचीवाडी थेरोंडा, ता.अलिबाग, जि. रायगड )यास अटक करून त्याच्याकडून शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.
रायगड जिल्ह्यातील मंदिरांतील दानपेट्या फोडून पैसे, देवाच्या चांदीच्या मूर्ती चोरीला गेल्याचे अनेक गुन्हे घडले आहेत. त्यातील काही चोऱ्यांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले असले तरी तालुक्यातील प्रसिद्ध चौल-भोवाळे येथील दत्त मंदिरातील चोरीचा छडा अद्याप पोलिसांना लागलेला नाही. आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी तपास करण्याचे सोडून दिले की काय, अशी भावना दत्तभक्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे. चौल मंदिरातील 40 किलो चांदी चोरीला गेल्याची घटनेला वर्ष झाले तरीही, अद्याप तपास लागलेला नाही. यंदा चौल-भोवाळे येथील दत्तयात्रेला मंगळवार, दि.14 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर दत्त मंदिरातील चोरीच्या चर्चेला उधाण आले आहे.
चौल भोवाळे येथील प्रसिद्ध दत्त मंदिरात वर्षभरापूर्वी चोरी झाली होती. या मंदिरातील तब्बल चाळीस किलो चांदीची प्रभावळ चोरीला गेली होती. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरट्यांचे छायाचित्रण आढळून आले आहे. रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक अधिकारी बदलून दुसरे अधिकारी येवून त्यांना सुद्धा जवळपास दीड वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे त्यांनी मोठ मोठे गुन्हे उघडकीस आणले मात्र हा गुन्हा उघड करण्यात त्यांना अपयश आले आहे.तर रेवदंडा पोलिस ठाण्यात दोन अधिकारी बदलून आले. परंतु, एकाही अधिकाऱ्याला या चोरीचा तपास करता आला नाही. अशी चर्चा सद्यस्थितीत सुरू आहे.यावर्षी मंगळवार, दि. 14 डिसेंबरपासून दत्तयात्रेला प्रारंभ होत आहे. दरवर्षी या ठिकाणी पाच दिवसांची यात्रा भरते. जिल्ह्यासह राज्य-परराज्यातील अनेक व्यावसायिक या यात्रेत व्यवसायासाठी येत असतात. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. बाहेरुन येणाऱ्या अनोळखी व्यावसायिकांबरोबर सर्वच व्यावसायिकांची नोंदणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी आतापासूनच प्रभावी यंत्रणा राबविण्यात यावी, अशी मागणी दत्तभक्तांकडून होत आहे.चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले असतानाही ते सापडत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. चोरीचा तपास कुठपर्यंत आहे, याबद्दल मी वेळोवेळी पोलीस अधीक्षक, स्थानिक पोलिसांशी बोललोय. परंतु, ते प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारुन नेण्याचे काम करीत आहेत. हे पोलिसांचे अपयश आहे. याच चोरांनी चिपळूण, संगमेश्वराला चोरी केली असावी, परंतु, ते येथील पोलिसांच्या हाती लागले नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु, दुसऱ्या ठिकाणची कारणे सांगून स्वतःचे अपयश दुसऱ्यांवर ढकळण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला असून, त्यांना चोरीचे गांभीर्यच नाही, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते.अशी भावना दत्त भक्त यांच्यामध्ये झाली आहे.