मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) :-
कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट झाल्याने हे दोनही राजकीय नेते एकत्र येत असल्याच्या चर्चांना उधाण आले…राज ठाकरे यांचे भाचे यश देशपांडे यांच्या लग्न सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहिल्याने तसेच दोघांमध्ये संवाद रंगल्याने दोघे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली.विधानसभा निवडणुकीत मनसेचा पार धुव्वा उडाला तर शिवसेनेचीही पीछेहाट झाली. यानंतर लगेचच ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती…विधानसभा निवडणूक प्रचारात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पहिला गद्दार अशी टीका केली होती…उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले होते…एकत्र येण्याविषयी निर्णय घेण्यास दोन्ही नेते सक्षम आहेत..घरगुती लग्नसोहळ्यात सर्व सगेसोयरे एकत्र येतात…ठाकरे बंधू त्या दृष्टीने एकत्र आले होते…भाजपच्या कपटी नीतीचा फटका यापूर्वी शिवसेनेने घेतला आहे…आता हा अनुभव मनसे घेत आहे. भाजपपासून चार हात लांब राहणे हे सर्वच मित्रपक्षांच्या फायद्याचे आहे…असे शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांनी सांगितले आहे…