मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने राजकीयच नाही तर फिल्म इंडस्ट्रीत सुद्धा खळबळ माजली आहे… पोलीसांच्या तपास यंत्रणेवर बोट ठेवत त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी याने आता प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत.ही हत्या बिश्नोई गॅंगनेच केली की इतर कारणांमुळे त्यांच्यावर गोळीबार केला गेला, हे अद्याप समोर आलेले नाही.बिल्डर लॉबीचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे… पोलीसांनी ज्या बिल्डरला, बांधकाम व्यावसायिकांवर संशय व्यक्त केला, त्यांची कसून चौकशी का केली नाही, असा सवालही त्यांनी केला… त्यांचा या खूनप्रकरणी संबंध असू शकतो, असे मला वाटत होते पण त्याची चौकशीच झाली नसल्याचा ठपका ठेवत झिशान सिद्दीकी यांनी संशय व्यक्त केला आहे… या हत्या प्रकरणाच्या चौकशीवर आम्ही समाधानी नाहीत… आमदाराची हत्या झाली आहे… लोकप्रतिनिधीची हत्या झाली आहे… त्यामुळे प्रत्येक अँगलने याचा तपास होणे अपेक्षित आहे… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात भेट घेणार आहे… कायदेशीर बाबीही तपासून घेणार आहोत… वेळप्रसंगी आम्ही कोर्टात जाऊ आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका झिशान सिद्दिकी यांनी मांडताना तपासावर पुन्हा नाराजी व्यक्त केली.या हत्याकांडात एक महत्त्वाच्या अँगलकडे झिशान सिद्दिकींनी लक्ष वेधले. सलमानला घाबरवण्यासाठी हे घडवले गेले असे अनमोल बिष्णोईने पोलिसांना सांगितले का? तसेच मुख्य आरोपी अजून सापडले नाहीत… मग तुम्ही कशाप्रकारे तपास केला आणि कोणता निष्कर्ष लावला आहे? घटना होऊन इतके महिने झाले, तरी मुख्य आरोपी सापडलेला नाही. कायदा सुव्यवस्था मुंबईत बिघडली आहे, असा गंभीर आरोप देखील झिशान सिद्दिकी यांनी केला.