पेणच्या हाजरत पीर सय्यद बद्रुद्दीन शाहा हुसैनी चिश्ती बाबांचा उरूस संपन्न… हाजारो भाविकांनी घेतला जियारतचा लाभ…!

0
50

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-

हाजरत पीर सय्यद बद्रुद्दीन शाहा हुसैनी चिश्ती (र.अ.) बाबांचा उरूस महोत्सव मंगळवार दि.१४ ते १५ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला…. गेल्या अनेक पिढ्यांपासून हा उरुस भक्तीभावाने साजरा केला जातो…. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते… उरुस काळात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन झाले…  रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामध्ये डोंगर परिसरात वसलेल्या जंगलातील हा सर्वात मोठा उरुस भरवला जातो… या ठिकाणी महाराष्ट्रासह विविध राज्यातील सर्वधर्मीय भाविक या उरुसामध्ये सहभागी होत असतात… या उरुसाला मंगळवारपासून सुरुवात झाली असून, या ठिकाणी सर्वधर्मीय भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहिला मिळत आहे… पेण तालुक्यामध्ये हजरत पीर सय्यद बद्रुद्दीन शाहा हुसैनी चिश्ती (र.अ.) बाबा यांची दर्गा  डोंगर परिसरात वसलेल्या जंगलात आहे… या दर्गामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उरुस भरवला जातो… दरवर्षी नुसार यावर्षीही हा उरुस भरवण्यात आला आहे…
उरुसाची परिस्थिती लक्षात घेता यावर्षी पोलिसांनी या ठिकाणी तगडा बंदोबस्त केला असल्याचे दिसून आले…  दर्ग्याच्या परिसरात फुले, चादर, अत्तर सुगंध, टोपीची दुकाने तसेच लहान मुलांची खेळणी, कपडे, जिलेबी मिठाई, हलवा पराठे, हॉटेल, चहाच्या टपऱ्या, मुलांसाठी खेळण्यासाठी जमपिंग जिपाक, रेलगाडी, आकाश पाळण्याला रोषणाई करीत यांसह आदि दुकाने लावण्यात आली होती… उरूसाच्या निमित्ताने दर्ग्याला करण्यात आलेली विद्युत रोषणाई ही भाविकांना आकर्षित करणारी ठरत आहे…. तसेच रात्री ग्यारवी शरीफ कार्यक्रमानंतर संदलची मिरवणूक काढून दर्गातील मजाराला अर्पण करण्यात आले… जियारतसाठी आलेल्या भाविकांनी गिलाफ, गुलाब फुलांची चादर, मजारला अर्पण करीत नियाज वाटप करण्यात आली… जीआरतसाठी येणाऱ्या भाविकांना जेवणाची लंगर (नियाज) उत्तम सोय करण्यात आली होती… सर्व धार्मिक विधींसाठी दर्गा कमिटी मुजावर, मुस्लिम बांधव व मौलवी यांची उपस्थिती होती… बाबांच्या दर्ग्यांवर आपले संकट दूर होण्यासाठी विविध मन्नती केल्या जातात व त्या पूर्ण होतात, अश्या विश्वासाने मन्नती केल्या जातात…  मन्नती पूर्ण झाल्यावर भाविक आपल्या कुटूंबासॊबत जागो जागी नियाज (जेवण ) बनवून वाटप करण्यात येते… गरीब गरजू लोकांना सदका खैरात दान करीत त्यांची मदत करण्यात येते… अशी भाविकांची श्रध्दा असल्याने दरवर्षी उरुसाला भाविकांची मोठी उपस्थिती असते…