नवी दिल्ली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे ) :-
राज्यसभेच्या खासदार श्रीमती ज्या बच्चन यांनी संसदेत अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्याबद्दल त्या खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत.भारतात जेष्ठ नागरिक असणे हा काही गुन्हा आहे काय ?आणि, असे जर असेल तर ६५ वर्षांवरील सर्व नागरिकांना मारूनच टाकावे…कारण, “सरकार” या “जेष्ठ राष्ट्र-निर्मात्यांकडे” लक्ष देण्यास इच्छुक दिसत नाही असे सरकारी राजकीय धोरणांवरून हे स्पष्टच होते आहे.भारतातील जेष्ठ नागरिक वयाच्या ७० वर्षांनंतर…१)वैद्यकीय विम्यासाठी पात्र नाहीत.२)त्यांना EMI वर कर्ज मिळत नाही.३)ड्रायव्हिंग लायसन्स दिले जात नाही.४)या वयात त्यांना कोणतेही काम मिळत नाही.आणि याचमुळे त्यांना आपले उर्वरित आयुष्य जगण्यासाठी नेहमी इतरांवर अवलंबून रहावे लागते. वास्तविकतः पाहिले तर त्यांनी “निवृत्ती” वयापर्यंत सर्व कर, विमा पॉलिसी प्रिमियम भरलेले असतात.जेष्ठ नागरिक झाल्यानंतर देखील त्यांना सर्व कर भरावेत लागतातच.भारतात ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतीही ठोस योजना नाही.विमान प्रवासावरची जेष्ठ नागरिक विशेष सूट देखील आता बंद करण्यात आली आहे.पण जेष्ठ नागरिक म्हणून उंबरठा ओलांडला की, भारतातील या जेष्ठ नागरिकांना अशा चक्रव्यूहातून बाहेर पडता पडता दमछाक होते.
या बाबतीत दुसरी विशेष गोष्ट म्हणजे “राजकारणातील” जेष्ठ नागरिकांना आणि आमदार, खासदार किंवा मंत्री यांना मात्र शक्य तितक्या सर्व सुविधा, फायदे दिले जातात..पण यापासून वंचित राहावे लागते ते सामान्य जेष्ठ नागरिकास..
सरकार कल्याणकारी योजनांवर खूप पैसे खर्च करते, मात्र जेष्ठ नागरिकांसाठी जाणीव ठेवत नाही.उलट बॅंकांच्या व्याजदरात कपात करण्यात आल्यामुळे जेष्ठ नागरिकांचे विशेषतःपेंशन धारक जेष्ठ नागरिकांना स्वतःचे पालनपोषण तर कधी कौटुंबिक जबाबदारी उचलणे तुटपुंजे पेंशन मिळत असेल तर अवघड होऊन जाते.या सर्व गोष्टी आयकर आस्थापनाच्या अधीन आहेत, तेव्हा सरकारनेच जेष्ठ नागरिकांचा हा मुद्दा विचाराधीन घेतला पाहिजे. जेष्ठ नागरिकांना दुर्लक्षित करता नये.शेवटी सरकार म्हणजे कोण ? आपणंच की…आपला भारत “प्रजासत्ताक” आहे.जगाच्या पाठीवर सर्वात मोठं लोकतांत्रिक राष्ट्र म्हणजे “भारत”…लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांचे चालवलेले राज्य… सरकार,जे नेहमीच प्रामाणिक असते..आणि असावे !!म्हणून आपण आशा करूया की, “सब का साथ, सब का विकास” असं जर का सरकारचं बोध वाक्य नेहमी ऐकायला मिळते, ते सरकार अशा राष्ट्र उभारणीत सदैव योगदान देत आलेल्या उच्चांकीत वयाच्या पलीकडे गेलेल्यांसाठी काहीतरी ठोस पावलं नक्की उचलेल.