भारताच्या लेकींची वर्ल्डकपमध्ये कमाल… नोंदवला सलग तिसरा विजय..श्रीलंकेचा मोठा पराभव

0
38

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):- 

            टीम इंडियाने अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकातील तिन्ही गट सामने जिंकले आहेत, आणि हे तिन्ही सामने भारतीय संघाने एकतर्फी जिंकले आहेत.दुसरीकडे या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाने पहिलाच सामना गमावला आहे. हा संघही सुपर सिक्समध्ये पोहोचला आहे.भारताने श्रीलंकन संघाला अवघ्या ५८ धावांत रोखत ६० धावांनी आणखी एक मोठा विजय नोंदवला, त्यामुळेच टीम इंडिया “अ” गटात सलग तिनं सामने जिंकून अव्वलस्थानी राहिली आहे, आणि सुपर-६ लीग टप्प्यासाठी पात्र ठरली आहे.या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी केली. तसा हा निर्णय श्रीलंकेच्या पथ्यावरच पडला होता, कारण भारताच्या गोंगाडी त्रिशा शिवाय इतर कोणतीच खेळाडू मोठी खेळी करू शकली नव्हती…टीम इंडियाने या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध  केवळ ११८ धावा केल्या होत्या, पण तरीही त्यांना सहज विजय मिळाला… त्रिशाने ५ चौकार आणि एका षटकार लगावत ४९ धावांची खेळी केली. तिच्या या खेळीमुळे टीम इंडियाने ११८ धावांची मजल मारली. त्रिशा शिवाय अन्य एकाही फलंदाजाला २० धावापर्यंत मजल मारता आली नाही.. श्रीलंकेकडून दिलासा तिलकरत्ने आणि प्रमुदी मथासराने यांनी २-२ विकेट काढल्या… वेस्ट इंडीज बरोबरच्या सलामी सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून दणदणीत विजय नोंदवला होता,त्यानंतर मलेशियाला १० गडी राखून पराभूत केले आणि आता श्रीलंकन संघावर ६० धावांनी सनसनाटी विजय नोंदवत विजयाची हॅट्ट्रिक साधली… गुणतालिकेत भारतीय संघ ३ सामन्यांत ६ गुणांसह उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला आहे…