बदलापूर शिवसत्ता टाइम्स ( देवेंद्र मोरे) :-
शहरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती करून येथील स्मशानभूमींसाठी विद्युत व्यवस्था व्हावी असा अभिनव व नाविन्यपूर्ण उद्देश डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाची उभारणी करण्यात आली होती… सद्यस्थितीत या प्रकल्पाची प्रचंड दुरावस्था झाली असून, पालिका या प्रकल्पाला कचरा देत नाही, तरीही संबंधित कंत्राटदार पालीकेची लाखो रुपयांची लूट करत असल्याचे संभाजी शिंदे यांचे म्हणणे आहे… याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्याकडे केली आहे…
याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी तक्रार दिली असून, तक्रारीची दखल घेण्यात आली आहे तसेच लवकरच त्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली जाईल असे कुळगांव-बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.मारुती गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले….