58 वा निरंकारी संत समागमाचा पहिला दिवस उत्साहात… तीन दिवसीय समागमात देश-विदेशातून लाखो भक्त सहभागी…

0
38

पुणे शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

२५ जानेवारी २०२५ विस्तार फक्त बाहेरूनच नव्हे, तर आतूनही व्हावा…प्रत्येक कृतीतून निरंकार परमात्म्याचे अस्तित्व जाणवले पाहिजे…पण त्यासाठी आधी त्याची ओळख होणे गरजेचे आहे…असे मार्गदर्शन सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी ५८ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या पहिल्या दिवशी केले. या तीन दिवसीय समागमात देश-विदेशातून लाखो भक्त सहभागी झाले आहेत…सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी सांगितले की, भक्ति ही जीवनातील प्रत्येक क्षणात करता येते…ती फक्त एक कृती नसून,परमात्म्याच्या अस्तित्वाचा सततचा अनुभव आहे…भक्ति केवळ बाह्य दिखावा न राहता,ती मन,वचन,आणि कर्मांची एकरूपता असायला हवी…
समागमाच्या दुसऱ्या दिवशी सेवादल रॅलीचे आयोजन करण्यात आले…हजारो स्वयंसेवक खाकी गणवेशात सहभागी झाले. सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी शांतीचा प्रतीक असलेल्या पांढऱ्या ध्वजाचे आरोहण केले. रॅलीत विविध नाटिका आणि शारीरिक प्रदर्शनाद्वारे सेवा आणि कर्तव्याच्या भावनेचा संदेश दिला गेला…समागमाचे विशेष आकर्षण बाल प्रदर्शनी ठरली…मुलांनी तयार केलेल्या मॉडेल्समधून संयम, सातत्य आणि विश्वास यांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले गेले…चायनीज बांबू स्टोरीसारख्या उदाहरणांनी जीवनात प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला…या समागमामुळे आत्मिक उन्नती, मानवता आणि सेवा यांचे महत्त्व अधोरेखित झाले असून, भक्तगणांमध्ये सकारात्मकता आणि समरसतेचा संदेश पसरला आहे…