प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन माझी वसुंधरा ५.० ची थीम…ग्रामपंचायत चौक यांचा स्तुत्य उपक्रम…

0
40

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-

प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत चौक यांनी माझी वसुंधरा हे अभियान यशस्वी करण्यासाठी संपुर्ण दिवस जनजागृतीसाठी नवनविन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे… त्यामुळे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन हा एका वेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आल्याने ग्रुप ग्रामपंचायत चौक हद्दीतील सर्व ग्रामस्थ माझी वसुंधरा ५.० हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले…
माझी वसुंधरा अभियान ५.० हे महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागचा उपक्रम आहे… पंच महाभुतावर म्हणजे भूमी, वायु, जल, अग्नी, आकाश या पंचमहाभूतांवर आधारित पाच निर्देशक विकसित करण्यात आले आहेत… निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि वायू मंडळात प्रदूषित होत असलेल्या वसुंधरेचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे… भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत चौक यांनी सर्वांच्या सहकार्याने नव नविन कल्पना रुजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत… चौक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे माझी वसुंधरा अंतर्गत वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोष वाक्य, चित्र कला स्पर्धा अशा माध्यमातुन विद्यार्थी यांच्या मार्फत जनजागृती करताना त्यांना प्रोत्साहित देखील करण्यात आले… यावेळी विद्यार्थी यांना प्रोत्साहन म्हणून पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले… त्यामुळे या अभियानात चौकची कामगिरी उंच भरारी घेईल असे वाटते… विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्यासाठी सेल्फी पॉइंट देखिल उभा करण्यात आला आहे… माझी वसुंधरा ५.० हे अभियान यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, ग्रामस्थ, पर्यावरण प्रेमी, अभ्यासक यांचे सहकार्य घेण्यात येत असून, सर्वांचा प्रतिसाद अतीशय उत्साह वाढविणारा आहे, असे सरपंच रितू ठोंबरे यांनी सांगितले… माझी वसुंधरा ५.० माध्यमातून करण्यात येत असलेले उपक्रम याचा विचार करता येत्या काळात चौक ग्रामपंचायत पंच महाभुतांच्या आधारावर परिसरातील वातावरण पोषक निर्माण करेल असे ग्रामपंचायत अधिकारी एस.पी.जाधव यांनी सांगितले… विशेष म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी यासाठी अहोरात्र मेहनत घेताना दिसत आहेत….