रेल्वे आणि एसटी बसचे आरक्षण फूल्ल झाल्याने खासगी ट्रॅव्हल्सच्या विळख्यात होळीच्या सणाला गांवी निघालेल्या कोंकणी माणसाची पिळवणूक… 

0
39

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :- 

गौरी-गणपती नंतर कोंकणी माणसाचा मोठा सण म्हणजे “शिमगा” म्हणजेच होळीचा सण. कोकणचा चाकरमानी या सणांना आपले गांव गाठण्यासाठी सध्या कोंकण रेल्वेलाच प्राधान्य देतो. कोंकण रेल्वेची साथ मिळाल्यापासून कोंकणी माणसाची होळीच्या सणाला आपल्या गावी जाण्याच्या धडपडीला थोडासा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी त्यांनी रेल्वेचे आरक्षण मिळावे म्हणून किती आधी धडपड सुरू हा खरा यक्ष प्रश्न आहे.
खरं तर याबद्दल कोंकण रेल्वे प्रशासनाने आणि राज्य शासनाने यासाठी कोंकणी माणसांची साथ देत त्यांच्या पाठीशी उभे रहायलाच हवे. कोंकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री प्राध्यापक मधू दंडवते (प्रजा समाजवादी पक्ष) आता हयात नाहीत आणि कोंकण रेल्वेचे पुरस्कर्ते जॉर्ज फर्नांडिस (संयुक्त समाजवादी पक्ष) हे देखील आता आपल्यात नाहीत. ज्या कोकणच्या भूमि-पुत्रांनी आपल्या थेट वडिलोपार्जित जमिनी या कोंकण रेल्वेच्या प्रकल्पासाठी सरकारला  तुटपुंज्या सरकारी दराने दिल्या, त्याच या कोंकणातील भूमि-पुत्रांवर सणासुदीच्या हंगामात आपल्या गांवी आपल्या घरी जातांना रेल्वे आरक्षणासाठी यातना आणि यातायात सहन करावी लागणे यासारखी या सर्वोच्च  लोकशाहीच्या देशात एक नामुष्कीची आणि घृणास्पद कहाणी आहे, आणि याला जबाबदार आहे तो कोंकण रेल्वे प्रशासनीक सावळा गोंधळ आणि राज्य सरकारचा नाकर्तेपणा.
यावर्षी होलिकोत्सव मार्च १३ पासून सुरू होत आहे. मात्र या तारखा दरम्यानचे जवळ जवळ सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने आरक्षण न भेटलेल्या चाकरमान्यांची चिंता वाढली आहे. होळी, धुलीवंदन आणि त्यांच्या आदल्या दिवशीच्या म्हणजे दिनांक १२, १३ आणि १४ मार्चच्या तुतारी, कोकणकन्या, मांडवी, वंदे भारत, जन्मशताब्दी एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस आदि गाड्यांची आरक्षण स्थिती (Regret) रिग्रेट दाखवत आहे.
आता नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमान्यांना अतिरिक्त (Special) खास गाड्यांची वाट पहावी लागणार आहे. आणि अजून पर्यंत तरी कोंकण रेल्वे प्रशासनाने कोणत्याही  अतिरिक्त गाड्यांची घोषणा केलेली नाही. पण मात्र या सणादरम्यान गाड्यांची आरक्षण स्थिती पाहता  रेल्वे प्रशासनाला या मार्गावर जास्त गाड्या सोडाव्या लागणार आहेत.
यावर्षी होलिकोत्सव मार्च १३ पासून सुरू होत आहे. मात्र या तारखा दरम्यानचे जवळ जवळ सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने आरक्षण न भेटलेल्या चाकरमान्यांची चिंता वाढली आहे. होळी, धुलीवंदन आणि त्यांच्या आदल्या दिवशीच्या म्हणजे दिनांक १२, १३ आणि १४ मार्चच्या तुतारी, कोकणकन्या, मांडवी, वंदे भारत, जन्मशताब्दी एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस आदि गाड्यांची आरक्षण स्थिती (Regret) रिग्रेट दाखवत आहे.
रेल्वे प्रशासन व राज्य शासन काय करते आहे. खासगी व अधिकृत तिकीट बुकिंग एजंट्स ना झुकते माप का ? रेल्वे प्रशासनाने नियुक्ती केलेले तिकीट एजंट लॉबी म्हणजे भस्मासुर आहेत हे मी सांगण्याची गरज नाही हे सर्वश्रुत आहे.
सर्वात आधी एजंट म्हणजे दलाल या शब्दाचीच मला घृणा आहे. संपूर्ण देशाचेही असेच आहे, आपल्या देशात विद्वानांची, तांत्रिक कौशल्ये असणाऱ्यांची कमी नाही,  पण आड येते ती दलालांची झोंडगिरी, नाहीतर आज भारत आता जेथे आहे त्याही पलीकडे जाऊन किर्तीमान ‌स्थापित देश असता. यासर्व प्रशासनीक सावळ्या गोंधळामुळे हा बेचैन कोंकणी माणूस मग खासगी बस कंपन्यांच्या ट्रॅव्हल एजन्सींकडे वळतो. त्यांना तर आयते सावज तावडीत मिळते. हे खासगी बसेसवाले तिकीटांचे अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन कोंकणी माणसाला पिळून काढतात शिवाय या ट्रॅव्हल्स वाल्यांकडून प्रवाशांना त्यांच्या जीवित किंवा वित्तहानीच्या कसल्याच जबाबदारीची हमी  दिली  जात नाही हे वेगळेच. आहे की नाही मज्जा रेल्वे प्रशासनीक अधिकारी आणि प्रायव्हेट ट्रॅव्हल्सवाले खातात तुपाशी आणि कोंकणी माणूस उपाशी.
पण आता हे खूप झाले, आता यावर रेल्वे प्रशासन व राज्य शासन यांनी निर्णय घेऊन या समस्येवर तत्पर ठोस पावले उचलली पाहिजेत त्यासाठी जन-आंदोलनाची यापैकी कुणीही वाट पाहू नये, हे ज्यांनी त्यांनी कानउघडणी समजावं किंवा इशारा. पण एकदा कोंकणी माणसाला न्याय मिळून या पिळवणुकीपासून मुक्त करा.