अनेक दिवसांनी अखेर पथ दिवे कार्यान्वित… नगर पंचायतीच्या सुविधांचे अनियमिततेचे चित्र समोर… 

0
27

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

गेल्या अनेक महिन्यांपासून माणगाव न. पंचायतच्या भौतिक सुविधा कारभाराबाबत अनियमिततेचे चित्र सर्रास दिसून येत आहे…. याची अनेक कारणे समोर आली आहेत… जसे पथदिवे दीड-दीड आठवडा बंद असणे,  दहा-दहा पोलची लाईट पेटत नाही… अशावेळी तक्रार कोण करणार? याचा अर्थ अख्खी लाईनच गेली… मग पथदिवे देखभाल करणाऱ्या न.प.च्या कर्मचाऱ्यांना कसे कळत नाही…? काही वॉर्डमध्ये महत्वाच्या रस्त्याची साफसफाई कामगारामार्फत होत नसणे, रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा न उचलणे, घरेलू कचरा उचल करणारी घंटागाडी दोन दोन दिवस न येणे, कधी कधी एक दिवस आड येणे, महिन्यातून दोन दिवस चुकून दिखावा म्हणून येणे, कधी सकाळी, कधी दुपारी, कधी सायंकाळी अशा प्रकारे मर्जी वाटेल त्या प्रमाणे घरेलू कचरा नेण्यासाठी येत असल्याने गृहिणींची चांगलीच तारंबळ उडत असते… कधी कधी चुकून कचरा गाडीच्या गाण्याचा आवाज ऐकू येताच लोक कचरा देण्याच्या तयारीत असतात….  मात्र गाडी दुसऱ्या गल्लीतून परस्पर जाऊन अनेकदा फसगत होत असल्याचे पाहायला मिळत आहे…

असाच प्रकार वॉर्ड क्र.१६ मध्ये कचरा गाडी सकाळी येत असते, मात्र त्याच वॉर्डमध्ये सकाळच्या वेळेत गाडी आली की, तीच गाडी त्याच भागात असूनही चक्क पलिकडच्या गल्लीत दुपारी नाहीतर सायंकाळी येते… अशीच परिस्थिती पिण्याच्या पाण्याचीही असलेली दिसून येते… दोन ते चार दिवस पिण्याचे पाणी वेळेत येण्याचे वगळता अनेकदा पाणी पुरवठा वेळेत होत नसल्याचे चित्र आहे… पाणी येणार नसल्याची पूर्व कल्पना अनेकांना  नसते तसेच अचानक पाणी पुरवठा होत असल्यामुळे अनेकांची मात्र तारांबळ उडते… यामुळे कामावर जाणाऱ्यांची पाणी भरण्यास कसरत होते…. या सर्व समस्या एकीकडे भेडसावत असताना पथदिव्याबाबतही समस्या याला जोड म्हणून की काय ? काही वॉर्डमधील अनेक खांबाचे पथदिवे दीड दीड आठवडे पेटत नसल्याचे चित्र दिसून येते…. यात प्रामुख्याने वॉर्ड क्र. १५ व १६ येथील अंतर्गत महत्वाच्या रस्त्यावरील पथदिवे चालूच नसतात… त्यामुळे अनेक दिवस झाली रस्त्यावरील पथदिवे का बंद आहेत… ? असा प्रश्न रहिवाशांमधून होताना दिसत आहे… एकादा पोलची लाईट गेली की तक्रार नोंद केल्याशिवाय नवीन दिवे बसविले जात नाहीत…  मग अशावेळी तक्रार कोण करणार… ? अशावेळी पथ दिवे देखभाल करणाऱ्या नगर पंचायतच्या कर्मचारी यांना कसे कळत नाही… ? प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडे विचारपूस केल्यावर ते तात्काळ लक्ष घालून न. पंचायतीकडे निदर्शनास आणून दिल्यावरच पथदिवे कार्यान्वित केले जातात…  मग अशावेळी नगर पं.ची जबाबदारी नाही काय ?  त्याचप्रमाणे शहरातील घर संकुलन, कॉम्प्लेक्स मधील सांड पाणी चक्क रस्त्यावर वाहत असते… यामुळे या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होत असते…. तर दुसरीकडे न. पंचायतने बांधलेला नाला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सोय करण्यात आली आहे… मात्र या नाल्यात चक्क सांडपाणीच सोडले गेल्याने परिसरात दुर्गंधी  पसरली आहे…. नगर पंचायतने वॉर्ड क्र. १६ येथील एका महत्वाच्या अंतर्गत रस्त्याच्या बाजूला न. पंचायतकडून एका वर्षापूर्वी नाला बांधला गेला होता…. मात्र अर्धवट काम केल्याने व यातच सांडपाणी सोडले गेल्याने या उन्हाळ्यामध्ये नाला तुंबून नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे… तसेच येथील एका तीन मजली ईमारतिचे सांडपाण्याची टाकी फुटल्याने त्यातील सर्व पाणी वाहत आहे…. या इमारतीचे मालक उपसा करणाऱ्या टॅन्क आणुन करीत होता ती त्यांनी बंद केल्याने व इमारतीची टाकी ज्यांनी फोडली आहे त्यांना जाब विचारला  नाही किंवा त्याची साधी रिपेअरिंगही केली नाही…. येथील एका सुज्ञ नागरिकाने या सांडपाण्यामुळे आपल्या कुटुंबातील  सदस्य वारंवार आजारी पडत असल्याने त्यांनी ट्रॅक्टरने माती आणून आपल्या निवासाच्या समोर नाल्याच्या दोन्ही  बाजूने माती टाकून होणाऱ्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी वॉर्ड क्र. १६ येथील एका नागरिकाने माणगाव नगर पंचायतने अर्धवाट बांधून सोडलेल्या नाल्यात स्वतःच्या खर्चातून मोटर लावून पाणी बाहेर काढले आली आहे….  या अर्धवट नाल्याची समस्यांबाबत दोन महिन्यापूर्वी येथील  नगरसेवकांना समस्या सांगून त्यांच्या सूचनेप्रमाणे या समस्यांचा तक्रार अर्ज न.पं. चे मुख्याधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला… मात्र नगरपंचायतकडून कोणतेही पाऊल उचलले नाही… नगर पंचायत एकीकडे अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण हटवणे यात लक्ष देत आहे…  मात्र दुसरीकडे इतर भेडसावणाऱ्या समस्यांबाबत लक्ष का दिले जात नाही ? हा प्रश्न समोर उभा राहिला आहे….