चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-
खालापूर तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत तांबाटी यांच्या कार्याची माहिती घेऊन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टेवाड यांनी विशेष कौतुक केले आहे… आज त्यांनी ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी यांच्या कामाची विशेष पाहाणी केली…
खालापूर तालुक्यातील कार्यक्षम व आर्थिक सक्षम असलेली तांबाटी ग्रामपंचायत ही विविध कामाच्या आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात संपूर्ण तालुक्यात अव्वल स्थानी आहेत… नुकताच त्यांनी ‘माझी वसुंधरा ५.०’ अंतर्गत कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे… माझी वसुंधरा अंतर्गत ५.० कामाची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायत करीत असलेल्या विविध विकासकामांची देखील पाहणी केली… ग्रामपंचायत करीत असलेल्या आदर्श आपले सरकार सेवा केंद्र विकसित करण्याबाबत योग्य मार्गदर्शन करून प्रधानमंत्री सोलर योजनेत जास्तीत जास्त योजना सोलर करण्यासाठी सूचित केले… यावेळी त्यांनी शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, रोजगार केंद्र यांची पाहणी करून सर्वच सोलर करण्याबाबत मार्गदर्शन केले… महिला बचत गटाने हॅन्डवाॅश, साबण हे निमसत्व ब्रॅंड तयार केले आहे, त्याची पाहणी करून हे उत्पादन कमीत कमी खर्चात तयार करण्याची पद्धत तसेच मार्केटिंग करण्याबाबत बचत गटाला मार्गदर्शन केले आणि तेथील उत्पादने स्वखर्चाने विकत घेतली… सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, वृक्ष रोपण, स्वच्छ पाणी, पाणी साठवण टाकी, गटारे, आरोग्य बाबतची माहिती यांची पाहणी करत असताना ग्रामस्थ यांच्या बरोबर चर्चा करून ग्रामपंचायत विषयी माहिती घेतली… ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम, सरपंच अविनाश आम्ले, उपसरपंच नितीन कदम ग्रामपंचायत कर्मचारी व सदस्य यांचे विशेष अभिनंदन केले… यावेळी ग्रामपंचायतिच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल यांचा सत्कार करण्यात आला…