अशोका शॉपिंग सेंटर मधील अनाकलनीय प्रकार…निलेश दावडा,अजय उबाळे हे एम.एस.भाईजींच्या विरोधात…गच्ची, कंपाऊंडची जागा, गाळे यांची अफरातफरचे आरोप… 

0
25

 मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे) :-

अशोका शॉपिंग सेंटर प्रिमायसेस  को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. चे चेअरमन आणि संस्थेचे सभासद एम. एस. भाईजी यांनी निलेश दावडा आणि अजय उबाळे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत… अशोका शॉपिंग सेंटर प्रिमायसेस  को-ऑप. सोसायटी लि. चे  चेअरमन आणि संस्थेचे  सभासद एम. एस. भाईजी हे गेली २४ वर्ष या इमारतीत राहत असून चेअरमन हे पद गेली 24 वर्ष सांभाळत आहेत… परंतु त्यांना त्यांच्या सोसायटीत राहणारे आणि पूर्वाश्रमिचे मित्र निलेश दावडा, अजय उबाळे हे एकेवेळी कट्टर मित्र होते… परंतु निलेश दावडा, अजय उबाळे यांनी चेअरमन एम. एस.भाईजी यांच्यावर बेकायदेशीरपणे संस्थेचे चेअरमन हे पद आणि सभासद पद सांभाळत आहेत…असे आरोप केले आहेत… याच सोसायटीत तळ मजल्यावर असणारे गाळे हे अजय उबाळे यांच्या नावे असून भाईजी यांनी बळकावल्याचा आरोप केला आहे… भाईजी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे… न्यायालयीन लढा जिंकण्यासाठी वकिलांची भेट घेतली आहे…

एम.एस भाईजी यांनी सगळे आरोप फेटाळून लावले आहेत…भाईजी यांनी कालच या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे… की गेली 24 वर्ष मी चेअरमन आणि संस्थेचे सभासद पद आणि सोसायटीचा सर्व कारभार सांभाळत आहे. मी गाळे किंवा शॉप सेंटर हडप केलेले नाहीत… किंवा तळ मजल्यावर असणाऱ्या गाळ्यांची विक्री सुद्धा केलेली नाही… माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून त्यात तथ्य नसल्याचे तक्रार करताना म्हटले आहे…

मी मुंबई उरण रायगडचा सुपुत्र असून मी गद्दारी कशी करेन? अजय उबाळे आणि निलेश दावडा असे अचानक माझ्या विरोधात जाऊन पोलीस ठाण्यात खोटे आरोप लावत वारंवार तक्रार दाखल करत आहेत… मी महाराष्ट्रातीलच  असून अचानक सदर सोसायटीतील गाळे विक्री किंवा खरेदी केलेले नाहीत, मी सदर संस्थेचे सांभाळत असलेले चेअरमन हे पद हे त्यांना खटकट आहे… माझ्या चेअरमन पदावरून त्यांच्या मनात संशय आहे, चेअरमन हे पद मी बेकायदेशीर सांभाळत नाही… सगळी कागद पत्रे माझ्याजवळ आहेत, त्याची पूर्तता मी करीत आहे… मला वारंवार धमकी येते आहे की, याच सोसायटीमध्ये मी कार्यालयात बसतो परंतु मला अनेक शारीरिक आणि मानसिक आजार आहेत तर मला शौचालयामध्ये जायचे असेल तर ही लोक शौचालयास कुलूप लावतात… अनेक लोकांना गोळा करून माझ्या विरोधात उभे करतात, पोलीस सुद्धा यांचीच बाजू घेतात, आमचं ऐकूनच घेत नाहीत… तर निलेश दावडा आणि बाकीचे त्यांचे सहकारी हे गुंड आहेत… अंडरवर्ल्डशी त्यांचा संबंध असल्याचा घणाघाती आरोप सुद्धा केला आहे… मला न्याय मिळावा म्हणून मी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे… सद्या एकमेकांच्या विरोधात आरोप आणि प्रत्यारोप सुरु आहेत… अबू बखर खान यांनी सुद्धा त्रास देणाऱ्या या सर्व लोकांविषयी तक्रारीचा पाढा वाचला आहे… आरोप केलेल्यांची नावे भाईजी यांनी सांगितली आहेत… निलेश दावडा, अजय उबाळे, राजेश ठक्कर, राजन शहा, साबिया खान, ऍडव्होकेट आत्थर शहा ही सगळी मिळून माझी गळचेपी करत आहेत… माझ्या जीवाला या लोकांपासून धोका आहे… म्हणून मी काल पोलीस ठाण्यात धाव घेऊन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली…