रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन) :-
रायगड जिल्ह्यातून नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारे हेटवणे धरण तालुक्यात असून, या हेटवणे धरणापासून काही अंतरावर असणाऱ्या तिलोर व महागाव परिसरात काल रात्री पासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले…. काल रात्री 10 च्या सुमारास पहिला धक्का जाणवला, त्यानंतरही काही सौम्य धक्के जाणवल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे….
पेण तालुक्यातील तिलोरे व सुधागड तालुक्यातील महागाव परिसरातील देऊळवाडी, कलाकाराई, भोप्याची वाडी, कवेले वाडी येथे भूगर्भातून आवाज येवून जमिन हादरल्याची घटना काल रात्री 11.30 ते 12.30 वाजताच्या दरम्यान घडली असे नागरिकांनी स्थानिक प्रशासनास कळविले होते…. सदर घटना भूकंप असून याबाबत भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे…
या घटनेमध्ये कोणतीही मोठी दुर्घटना झाली नसून, जीवितहानी झाली नाही…. जिल्हा प्रशासन या संदर्भात अलर्ट मोड असून, अधिक माहिती घेण्याचे काम चालू आहे… या घटनेची भारतीय हवामान विभाग मुंबई (IMD) नुसार तसेच कोयनानगर जि.सातारा येथील भूमापन केंद्र येथे भूकंपाची नोंद झाली नसल्याचे आढळून आले आहे… याठिकाणी तहसिलदार सुधागड यांनी पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला आहे… लवकरच भूगर्भ तज्ज्ञ कडून पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे… पेणचे तलाठी व पेण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनीही या ठिकाणी भेट दिली…
सदर घटनेत काही घरांचे किरकोळ नुकसान झाले असून, जिवीतहानी झालेली नाही…. या ठिकाणच्या अधिक सर्वेक्षणासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांना सदर ठिकाणी सर्वेक्षण करण्यास विनंती करण्यात आलेली आहे… तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे…