धाटाव एमआयडीसी हद्दीतील कॅलकेम कंपनी बंद…मालक दिवाळखोरीत… कॅलकेम कंपनीने कामगारांचे दोन महिन्यांचे पगार बुडवले…

0
32

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-

धाटाव एमआयडीसी हद्दीतील कॅलकेम कंपनी बंद पडली असून कंपनीचा मालक दिवाळखोरीत निघाला. कॅलकेम कंपनीने कामगारांचे दोन महिन्यांचे पगार बुडवले असून, रजेचे पैसे सुद्धा दिलेले नाहीत. अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत कर आणि सरकारी कर थकबाकी आहे. दिवाळखोरीत निघालेला सदर कारखाना साधना कंपनी व्यवस्थापनाने घेण्याचा ठरवले असून सदर कंपनीतील मशीनरी भंगारात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  याची कुणकुण लागताच कामगारांनी न्याय मिळवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे यांच्याकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कामगारांच्या हक्कांसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. जर कारखाना हलवला तर कॅलकेम कंपनीतील कामगारांची थकीत देणी  देणार कोण ? असा सवाल साधना नायट्रोकेम कंपनीला केला आहे.जोपर्यंत कॅलकेम कंपनीच्या कामगारांची आणि ठेकेदाराची देणी तसेच ग्रामपंचायत कर थकबाकी भरणा केला जात नाही,, तोपर्यंत कारखान्यातील साहित्य हलवू देणार नाही असा इशारा ठाकरे गटाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे  यांनी दिला आहे …

कॅलकेम कंपनी बंद पडली, कामगारांचे नुकसान झाले, कुटुंब उध्वस्त झाली, राजकीय नेत्यांनी कामगारांचे लक्ष दिले नाही… उलट स्वतःची खळगी भरली. यापूर्वीही पेप्सी कंपनी बंद पडली त्यावेळी कामगारांना वाऱ्यावर सोडत पोलीस बंदोबस्तामध्ये कारखाना हलवला. आज पेप्सी  कंपनीचे कामगार देशोधडीला लागले आहेत. पेप्सीची झाले तसे हाल कॅलकेम कंपनीच्या कामगारांचे होऊ देणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुर्णपणे कामगारांच्या पाठीशी ठाम राहणार असून लवकरच रोहा पोलिसांना निवेदन देखील देणार आहोत, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी सांगितले.