रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे यांच्या संकल्पनेतून आणि श्री. मधुकर पाटील (रायगड जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)यांच्या मार्गदर्शनाखाली भुवनेश्वर येथे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला… हा कार्यक्रम महिलांनी महिलांसाठी आणि महिलांच्या मदतीने आयोजित केला होता… सौ. अपूर्वा नागेश शिंदे, सौ. मृणाली गणेश शिवलकर, सौ. अपर्णा किशोर पाटील आणि सौ. सारीका नाकती यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान दिले…
महिला दिन हा स्त्रीत्वाचा सन्मान करण्याचा दिवस असल्याने या कार्यक्रमात 400 ते 450 महिलांचा गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. महिलांनी एकत्र येत संघटनात्मक शक्ती आणि समानतेचा संदेश दिला… कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी वरसे ग्रुप ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच श्री. रामाशेठ म्हात्रे, उपसरपंच सौ. डॉ. स्वप्नाली पाटील, माजी सरपंच सौ. मीना म्हात्रे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. मनोहर सकपाळ, श्री. शांतीशील तांबे, सौ. ज्योती थळे, सौ. जयश्री पाटील आणि सौ. सारीका दळवी उपस्थित होते…
महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये विजेत्या महिलांना पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तितीक्षा अमेय जोशी यांनी प्रभावीपणे पार पाडले, ज्यामुळे संपूर्ण सोहळ्याला विशेष रंगत आली… या कार्यक्रमाने स्त्रीशक्तीचा सन्मान, महिला एकता आणि समानतेचा संदेश दिला… अशा उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी सामाजिक एकजूट महत्त्वाची आहे, असा संदेश या सोहळ्यातून मिळाला…