रोह्यातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण न झाल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू… रोह्याच्या विकासाची गती मंदावली;मुख्य रस्त्यावरील कामे अपूर्णच…

0
17

रोहा शिवसत्ता टाइम्स (दीप वायडेकर):-

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे…रोह्यातील मुख्य रस्त्यावरील व्यापाऱ्यांच्या वाढीव बांधकामामुळे रोह्यातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण न झाल्याने रोह्यातील होतकरू तरुण अमोल मोरे याचा लावलेल्या डीवायडरला आदळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे…यामुळे रोह्यात संपूर्णतः शोकाकुल पसरला आहे. अमोलच्या अचानक जाण्याने कुटुंबियांवर आणि मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मात्र रोहा प्रशासन आणि रोहा बांधकाम विभाग याकडे कान्हा डोळा करतांना दिसत आहेत. जवळपास दोन वर्षे होत आली परंतु अजूनही मुख्य रस्त्याचे काम मंद गतीने सुरू आहे.व्यापाऱ्यांच्या वाढीव बांधकामावर कारवाई करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले नाही, पावसाळा तोंडावर येऊन सुद्धा रस्त्यालगत असलेल्या गटाराचे काम अजूनही सुरू झाले नाही ही एक चिंतेची बाब आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तटकरे कुटुंबाकडून रोह्यात सुसज्ज हॉस्पिटल, डॉ चिंतामणराव देशमुख सभागृह,छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी,रोह्याच्या मुख्य रस्त्याचा हनुमान टेकडी वरून नेकलेस नजरा, रोह्याच्या मुख्य प्रवेशद्वार,रोह्यात मल्टिप्लेक्स चित्रपट गृह ,रोह्यातील ऐतिहासिक श्री मारुती मंदिर असे अनेक मुद्दे उपस्थित करून रोहेकरांना आश्वासित केले होते…तटकरे कुटुंबियांवर विश्वास ठेवून रोहेकर जनतेने त्यांना भल्या मोठ्या फरकाने विजयी केले…परंतु त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला की काय असा प्रश्न रोहेकरांना पडला आहे.

खासदार सुनील तटकरे हे एक राष्ट्रवादी पक्षाचे संवेदनशील नेते आहेत…त्याचप्रमाणे त्यांची कन्या आमदार कु अदिती तटकरे यासुद्धा महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आहेत…त्यांना महाराष्ट्रात टॉप युवा आमदारांमध्ये संबोधिले जाते…परंतु देशाच्या राजकारणात ऍक्टिव्ह असलेले तटकरे कुटुंब कशाप्रकारे आता आपल्या मतदारसंघातील समस्या दूर करतात आणि नागरिकांच्या समस्या सोडवतात हे पाहणे गरजेचे ठरणार आहे…