महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी आंदोलन… २९ मार्चपासून ३ दिवस बुध्दगयेत ठाण मांडणार:रामदास आठवले…

0
111
The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

पनवेल  शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :- 

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी रिपब्लिकन पक्ष देशभरात होणाऱ्या आंदोलनात सहभागी झालेला असून राज्यातही रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे महाबोधी महाविहारासाठी आंदोलनात सहभागी झाले आहे…महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात आलेच पाहिजे.त्यासाठी बिहारमधील महाबोधी टेंपल १९४९ चा एक अॅक्ट रद्द झाला पाहिजे…महाबोधी महाविहाराचे ४ट्रस्टी हिंदु आणि ४ ट्रस्टी बौध्द हा नियम रद्द करुन सर्व ट्रस्टी बौध्द असावेत असा कायदा केला पाहिजे या मागणीसाठी आपण येत्या २९ मार्चपासून तीन दिवस बुध्दगयेत ठाण मांडणार आहोत.बुध्दगयेत आंदोलन करणाऱ्या बौध्द धम्म्गुरूंची आपण भेट घेणार आहोत तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार,आणि बिहारचे राज्यपाल मा.मो.आरिफ खान यांची आपण भेट घेणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात यावे यासाठीच्या आंदोलनात मोठ्या संख्येने व पुर्ण ताकदीने उतरावे असे आवाहान रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले आहे.

चवदार तळे सत्याग्रहाच्या ९८व्या वर्धापनदिनी रायगड जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करणाऱ्या जाहिर सभेत ना.रामदास आठवले बोलत होते.
महाबोधी टेम्पल ऍक्ट १९४९चा रद्द करुन बुध्दगयेतील महाबोधी महाविहाराचा ताबा बौध्दांना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार त्यांना निर्देश देऊ शकतात तसा प्रयत्न आपण करणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.त्याच बरोबर मी स्वतःबिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांना आणि बिहारचे राज्यपाल मो.आरीफ खान यांना भेटून बुध्दगयेतील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी करणार आहे.तसेच बुध्दगयेत तीन दिवस थांबून बुध्द भिक्खूंच्या आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रासह बिहार आणि संपूर्ण देशभर आंदोलन सुरु ठेवणार असल्याची भूमिका आठवले यांनी स्पष्ट केली असुन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात रिपब्लिकन पक्ष ताकदीने उतरला आहे.सर्व आंबेडकरी जनतेने एकजुटीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला एकजुटीने बळ द्यावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.सभेपूर्वी ना.रामदास आठवले यांनी महाड येथील क्रांतीस्तंभाला अभिवादन केले.यावेळी हजारोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.     यावेळी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड,कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे,मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड,सुर्यकांत वाघमारे, युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे,परशुराम वाडेकर,विवेक पवार; घनश्याम चिरणकर,आदेश मर्चंडे,अमित तांबे,सुशांत सकपाळ,लोकप्रिय गायक आनंद शिदे,मिलिंद शिंदे,राहुल शिंदे,शाहीर राजा कांबळे,राहुल डाळींबकर,मोहन खांबे,लक्ष्मण जाधव,सुनिल बंसी मोरे,श्रीकांत कदम आदी मान्यवर उपस्थित होते.