रिलायन्स नागोठणे प्रकल्पाविरोधात उपोषणकर्ते आक्रमक… शेतकऱ्यांनी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी घेतली भेट…

0
28

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

शेतकरी,भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी बेणसे झोतीरपाडा प्रकल्पबाधित स्थानिक संघर्ष समिती आक्रमक झाली असून त्यांनी १ एप्रिलपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे…दुसऱ्या दिवशी दि.(02) बुधवारी पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी बेणसे सिध्दार्थनगर येथील उपोषकर्ते शेतकरी व स्थानिक भूमिपुत्र यांची भेट घेऊन चर्चा केली.उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन लवकरच रिलायन्स व्यवस्थापनातील रिलायन्सच्या वरिष्ठ व्यवस्थापनासोबत बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी तहसीलदार शेजाळ यांनी दिले…यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी शेतकरी व ग्रामस्थ यांच्या समवेत रिलायन्सने खोदकाम करून अडविलेल्या पुर्वापार वहिवाट व येण्या जाण्याच्या रस्त्याची पाहणी केली. शेतकरी, पशुपालक, मच्छिमार यांचे होणारे नुकसान यावर भरपाई, संरक्षण भिंत बांधू नये , सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीत प्राधान्य देण्याबाबत यावेळी चर्चा झाली…

यावेळी बेणसे झोतीरपाडा प्रकल्पबाधित स्थानिक संघर्ष समिती चे अध्यक्ष बबन अडसुळे, उपोषणकर्ते तथा माजी सरपंच सौ स्मिता कुथे, सौ.कल्पना अडसुळे, योगेश अडसुळे, सचिन कुथे, आदींनी तहसीलदार यांना जोपर्यंत आमच्या आठ मागण्या रिलायन्स नागोठणे व्यवस्थापणाकडून लेखी स्वरूपात मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला…