एक असे “आंबेडकर” ज्यांचा सर्वांनाच विसर पडावा… ?

0
54

मुंबई शिवसत्ता टाइम्स( देवेंद्र मोरे):-

“तेथे कर माझे जुळती” या उक्ती प्रमाणे… खरं तर आंबेडकरी जनतेने आधी अध्यापक कृष्णाजी केशव आंबेडकर गुरुजी यांच्या स्मृतीस वंदन करून नंतर बाबासाहेबाच्या चरणी लीन व्हायला हवे… कारण ज्यांनी जातीने ब्राह्मण असूनही अन्य समाजाची पर्वा न करता, त्याकाळातील कठोर कडवी जातीयता न जुमानता आपल्या या लाडक्या भिमरावला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले, शिक्षण आणि संस्कृती दिली, त्याला घडवले, उच्च शिक्षणासाठी त्याला परदेशात जाता यावे यासाठी सर्वोच्च काम केले… “आंबेडकर” हे आपले “आडनाव”  भिमरावला दिले… बडोदा संस्थानचे महाराज गायकवाड यांच्याकडे शिफारस करून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्यासाठी व छात्रवृत्ती व्यवस्थेसाठी साकडे घातले पण “तेजा पुढे काहीच दिसत नाही” याप्रमाणे “कृष्णाजी केशव आंबेडकर” हे नांव भिमराव उर्फ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेजःपुंज किर्तीने व कार्याने सततचे अंधारातच राहिले, त्यांचे साऱ्यांनाच विस्मरण झालेले आहे… हे कसे काय योग्य आहे ?
त्यासाठी आंबेडकरी जनतेने हे कदापि विसरतां नये… !!

एवढे करारी, तेजस्वी व्यक्तीमत्व देऊन ज्यांनी या भिमराव आंबेडकरना घडवले त्या “प.पू.  कृष्णाजी केशव आंबेडकर गुरुजी” यांना विसरता नये… त्यांच्या स्मृतीस आधी अभिवादन करून आपण आपले कर त्यांच्यासाठी प्रथम जोडायला हवेत… तरच भारतरत्न डॉ‌. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती दिवशीची खरी कृतज्ञता ठरेल…!