३३ वर्षीय नराधमाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार… तळा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल…

0
60

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

महाराष्ट्रात महिला भगिनी,अल्पवयीन व विकलांग मुली सुद्धा सुरक्षित नसल्याने अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र एकामागून एक अत्याचार घडत असतानाच तळा शहरात एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तेहतीस वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचारची घटना घडल्याने पीडित अल्पवयीन मुलीस औषध उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी तळा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील तळा शहरातील बाजारपेठ येथे एका घराचे बांधकाम आहे. सदर कामाच्या ठिकाणी तेहतीस वर्षीय नराधम गणेश महादेव रसाळ याने पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहित असतानासुद्धा तिच्या अज्ञात पणाचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पीडित मुलीवर अत्याचार झाल्याने तिची प्रकृती गंभीर झाली असल्याने तिला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचारार्थ दाखल केले.या घटनेची माहिती तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांना त्यांच्या माहितीदारामार्फत मिळताच दाखल १६एप्रिल २०२५रोजी संध्याकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी दाखल करण्यात आला असून आरोपीस रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती तळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांनी दिली आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार, अपहरण, विवाहितांचा छळ, विनयभंग असे प्रकार वाढत आहेत. जिल्ह्यात महिला किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. एकीकडे राज्य शासन महिलांना आर्थिक, सामाजिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी अनेक योजना आणत आहे, शैक्षणिक, रोजगाराच्या माध्यमातून स्त्रियांना सक्षम करण्यावर भर दिला जात आहे; मात्र दुसरीकडे महिलांवर अत्याचार, छळ सुरूच आहेत.

विशेष म्हणजे, बहुसंख्य घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्तींकडून अशी कृत्ये होण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा अत्याचारांमुळे मुली, महिला मानसिकदृष्ट्या प्रभावित होत असून, त्याचा फटका अप्रत्यक्षरित्या कुटुंब व्यवस्थेलाही बसत आहे. नात्यांमधील विश्वासालाही अत्याचारांच्या घटनांनी तडा जात असल्याचे चित्र आहे. बलात्कार आणि अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. असल्याची माहिती अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्त्या रुपाली पेरेकर यांनी दिली आहे.