रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात जुलै २०२० रोजी तांबडीतील पीडीतेवर अत्याचार व नंतर खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला. पीडितेच्या न्यायासाठी सर्व समाज रस्त्यावर उतरला होता. राज्यातील अनेक नेत्यांनी आरोपींना तत्काळ अटक व प्रकरण फास्ट ट्रकवर चालवण्याची मागणी केली.सरकारतर्फे चालवण्यात आलेल्या फास्ट ट्रकवरील खटल्यात पीडितेवरील अत्याचार व खून तांबडी प्रकरणातील सर्वच आरोपींची माणगांव सत्र न्यायालयाने गुरुवारी निर्दोष सुटका केली. सर्व आरोपींची निर्दोष सुटका होणे, हा न्यायालयीन निकाल सर्वांसाठी धक्कादायक आहे. त्यामुळे पीडितेची बाजू मांडण्यात सरकारी वकील उज्वल निकम कमी पडले की काय ? त्याचबरोबर तपासात काय त्रुटी होत्या, तपास करताना पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. मग घटना घडलीच नाही का ? असा सवाल समस्त रोहेकर करीत आहेत…गुरुवारच्या निकालानंतर रोह्यात संतापाची लाट उसळल्याचे शनिवारी समोर आले… आरोपींची निर्दोष सुटका होण्याचा निकाल दुर्दैवी आहे. तपास यंत्रणेचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत शुक्रवारी सायंकाळी तांबडी येथे समाज बांधवांची बैठक झाली.त्यानंतर शनिवारी सकाळी रोहा येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित मराठा समाज यांसह सर्व बहुजन समाजाने मंगळवारी पोलीस ठाण्यावर मोर्चाचे संकेत देऊन एकच खळबळ उडवून दिली.
दरम्यान, तांबडी अत्याचार व हत्या प्रकरणी लागलेला निकाल हा अत्यंत अन्यायकारक आणि दुर्दैवी आहे. कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, उच्च न्यायालयात जाण्याची तयारी आहे…अशी प्रतिक्रिया महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली…तर निकालाबाबत ॲड उज्वल निकम यांच्याशी चर्चा केली. तपासातील त्रुटी लक्षात घेत सखोल चौकशीचे संबंधितांना निर्देश देण्यात आलेत, पिढीतेच्या न्यायासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करू अशी ग्वाही खा सुनिल तटकरेंनी दिल्याने पुढे काय होते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष समीर शेडगे, भाजपचे अध्यक्ष अमित घाग, विभागीय नेते उदय शेलार, रमेश वायकर, महेश सरदार, अमित मोहिते, ॲड दीपक सरफळे, शाम लाड, हरेश नायनेकर, राजेश म्हांदलेकर यांसह विविध समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.पीडीतेच्या न्यायासाठी मोर्चा व मागण्यांच्या पार्श्वभूमीवर एकंदर प्रकरणाला नेमकी काय कलाटणी मिळते,रोहेकरांची काय आक्रमकता राहते ? याकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.