पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मूमधील घरांचे नुकसान… लष्करच नव्हे तर नागरिक,दवाखाने आणि शाळांही लक्ष्य…

0
14

जम्मू काश्मीर शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमावर्ती भागावर सतत हल्ले होत असून मागील २४ तासांत २६ ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर, अमृतसर, राजस्थान अशा सीमेवरील अनेक शहरांना निशाणा करत पाकिस्तान ड्रोन हल्ले करत आहेत. हे हल्ले भारताकडून निष्क्रिय केले जात आहेत. तसंच नियंत्रण रेषेवर सतत गोळीबार केला जात आहे. या गोळीबारात अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सीमेजवळील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यादरम्यान पाकिस्तानने त्यांच्या ३ एअरबेसवर हल्ला झाल्याचा दावा केला आहे.यात फक्त लष्करच नव्हे तर नागरिक, दवाखाने आणि शाळा यांनाही लक्ष्य केलं जात आहे. यामध्ये जम्मूमधील काही ठीकाणी घरांचे नुकसान झाले आहे. तसेच नागिरांकांना देखील यामुळे त्रास होत आहे.