अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे वेगवाने वाहणारे वारे लक्षात घेता मस्यविभागाने १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना बंदी घातली आहे…त्यामुळे मच्छीमार बांधव आता पुन्हा संकटात सापडले आहेत. २ महिने आमचा व्यवसाय ठप्प राहिल्याने आम्ही जगायचं कसं असा विचार या मच्छीमारांना पडलाय त्यामुळे सरकारने आम्हाला आर्थिक मदत करावी अशी मागणी या कोळी बांधवांनी सरकारकडे केली आहे…