माथेरान वन क्षेत्रपाल कार्यालय व शेलू तपासणी नाकाचे उदघाटन… मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते माझे वन संकल्पनेचा शुभारंभ …

0
9

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):- 

रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे वनपरीक्षेत्र अधिकारी,माथेरान कार्यालयाच्या नविन इमारतींचे उदघाटन सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी रायगड जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाकरिता नागाव ग्रामपंचायत व महाराष्ट्र राज्य वनविभाग यांच्यात नागाव समुद्रकिनाऱ्याला ‘ब्लू फ्लॅग’ मानांकन मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला…या कराराचे उद्दिष्ट नागांव बीचचा पर्यावरणपूरक आणि जागतिक दर्जाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करणे हे आहे.

या कार्यक्रमास महाराष्ट्राचे वनमंत्री मा.नामदार श्री. गणेश नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या समक्ष या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. ह्यावेळी मंत्री नाईक यांनी ग्रुप ग्रामपंचायतीचे सन्मानीय सरपंच सौ हर्षदा निखिल मयेकर यांचे कौतुक करत इतर समुद्र असणाऱ्या ग्रामपंचायतीला याचा आदर्श घेण्याचे आव्हान केले. यावेळी जिल्हा प्रशासन, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी,पर्यावरणतज्ज्ञ आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारीही उपस्थित होते…

‘ब्लू फ्लॅग’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवणारी एक प्रतिष्ठेची सन्मानचिन्ह आहे..जी समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसह पर्यावरणीय दर्जा, पायाभूत सुविधा व सुरक्षिततेच्या निकषांवर आधारित असते. वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रसंगी सांगितले, “नागांव समुद्रकिनाऱ्याचा विकास हा राज्याच्या पर्यटन धोरणाचा एक भाग आहे. ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र प्राप्त होणे म्हणजे जागतिक दर्जाच्या पर्यावरणपूरक पर्यटनाची दिशा आपल्याकडे येते आहे.नागांव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. हर्षदा निखिल मयेकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करत सांगितले की,“हा करार आमच्या किनाऱ्याच्या शाश्वत विकासासाठी एक नवे दालन उघडतो आहे…स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि आमचे गाव पर्यटन नकाशावर वेगळ्या ओळखीने उभे राहील.”

या करारानुसार, नागांव बीच परिसरात स्वच्छता, जैवविविधतेचे संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन, सुरक्षितता, आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामपंचायत आणि वनविभाग संयुक्तपणे विविध उपक्रम राबवणार आहेत. मा.उप वनसंवक्षक श्री.राहुल पाटील यांनी वनविभागाचे नागांव ग्रामपंचायतीच्या ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळवण्याच्या उपक्रमाला संपूर्ण पाठिंबा आहे…असे संबोधित करत सामंजस्य कराराबाबत विश्वास व्यक्त केला.
विशेष म्हणजे संपूर्ण भारतात फक्त 13 समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र आहे. आणि जर नागाव समुद्र किनाऱ्याला हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास देशातील 14 वा आणि महाराष्ट्रात पहिला समुद्र किनारा ठरणार आहे. यामुळे रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून ,रायगड जिल्ह्याचे महत्व अधिक वाढणार आहे …