मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा सेवा ३ महिने बंद… २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत सेवा बंद राहणार असल्याची माहिती…

0
8

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-  

पावसाळा सुरू झाल्याने,मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा (गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा फेरी सेवा) पर्यंत प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद राहणार आहे.ही सेवा उद्यापासून २६ मे ते ३१ ऑगस्ट पर्यंत बंद आहे. मात्र भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रो रो बोट सेवा सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मांडवा बंदर निरीक्षक आशिष मानकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे…
मुंबई येथील भाऊचा गेटवे ऑफ इंडिया आणि मांडवा दरम्यान बोट सेवा आहे. ज्यामध्ये ही बोट सेवा पीएनपी, मालदार आणि अंजठा,अपोलो आदी प्रवासी शिपिंग कंपन्यांमार्फत सेवा पुरवली जात असून यांच्या ८५बोटी आहेत.तर छोट्या प्रवासीबोटीची संख्या देखील सत्तर इतकी आहे.१ एप्रिल २०२४ते ३१मार्च २०२५ दरम्यान वीस लाख दहा हजारहून अधिक प्रवासी यांनी बोट आणि रोरो मधून प्रवास केला असल्याने महाराष्ट्र सागरी मंडळास चार कोटी दहा लाख रुपये तर रोरो मधून येणाऱ्या वाहनाच्या माध्यमातून पंचावन्न लाख अडतीस हजार रुपयाचा महसूल मिळाला आहे.
महाराष्ट्र मरीन बोर्डाने प्रवासी शिपिंग कंपन्यांना समुद्री प्रवास बंद करण्याबाबत पत्र जारी केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून,पावसाळ्यात जलवाहतूक बंद ठेवली जाते. त्यानुसार, २६ मे ते ३१ ऑगस्ट पर्यंत वाहतूक बंद राहील. मांडवा येथून गेटवे जलमार्गावर पीएनपी, मालदार, अजिंठा, अपोलो या बोटी प्रवासी सेवा देतात.  खबरदारीचा उपाय म्हणून जलमार्ग बंद राहणार आहे.
रो रो बोट सेवा सुरू राहणार आहे. यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळेल. मांडवा ते गेटवे जलवाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर वेळेची बचत होते. रस्ते मार्गे मुंबईत येण्यासाठी चार तासांहून अधिक वेळ लागतो. तर जलवाहतुकीमुळे अवघ्या तासाभरात मुंबईत पोहोचता येते.
26 मे पासून बंद करण्यात येणारी ही सेवा सप्टेंबर महिन्यात सुरू होईल. या काळात रो-रो बोट सेवा सुरू राहील.रो रो बोट सेवा हिच्या साधारण दिवसाला चार आणि रविवारी पाच फेऱ्या होणार असल्याने काही प्रमाणात प्रवासात दिलासा प्राप्त होणार आहे.ही सेवाही हवामान कसे असेल त्यानुसार सुरू असणार आहे. त्यामुळे आता पुढचे तीन महिने प्रवाशांना जलवाहतूकीऐवजी रस्त्याचा पर्याय असणार आहे.
पावसाळ्यात बंद राहणाऱ्या जलवाहतुकीचा अलिबाग आणि रायगडमधील पर्यटनावरही परिणाम होतो…मुंबईकरांना पर्यटनासाठी मांडवा समुद्रकिनारे आवडतात. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मांडवामध्ये अनेक गोष्टी विकसित झाल्या आहेत.