रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ… अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत…घरांची पडझड…

0
23

मुरुड शिवसत्ता टाइम्स (संतोष हिरवे):- 

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी पडझड झाल्याची माहिती आहे.अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मुलन झाली आहेत आणि काही ठिकाणी विद्युत पोल पडले आहेत, ज्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे.काही ठिकाणी धुळीचे वादळ येऊन नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सिगरे येथील सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ते खोदून ठेवल्यामुळे लोकांच्या घरात पाणी आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे…तालुका आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख तहसीलदार यांचा या प्रकरणाकडे कानाडोळा सर्वांनी बांधकाम खात्याने देखील पाठ फिरवली…जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना अधिकारी एसीमध्ये सुस्त आहेत…सार्वजनिक बांधकाम विभागात पाऊस चालू होऊन सुद्धा सर्व काम अपूर्ण असून जनतेला याचा नाहक त्रास होतोय…जनता रस्त्यावरती उतरण्याच्या भूमिकेत असून याला जबाबदार कोण ?जनता की प्रशासन ?असे जनसामान्यातून बोलले जात आहे..पूर्वीचे काम अपूर्ण असून सुद्धा जाणीवपूर्वक त्याच ठेकेदाराला कामे देणे कोणते कारण असेल किंवा राजकीय वरदहस्त की अधिकाऱ्यांचा डोक्यावरती असलेला हात असा जनतेतून सवाल होत आहे…हवामान खात्याने पुढील दोन दिवस यलो अलर्ट दिला आहे…