नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
रायगड जिल्ह्यात मे महिन्यातच जुलै महिन्यातील आषाढ सारखा तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे आता मान्सूनपूर्व पावसाने आर्थिक दणका दिल्यानंतर आता कोकणासमोर ऐन मे महिन्यातच जलसंकट उभ राहील आहे…त्यामुळे रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी सखल भाग पाण्याखाली गेले आहेत…तर,काही ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत…
पहिल्याच पावसात कर्जत रायगड नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे बिरदोले गावातील तरुणाचा अंगावर विज पडून मृत्यू झाला आहे.रोशन कचरू कालेकर (वय 25 वर्ष) हा शेतावर काम करीत असताना विज पडून मृत्यू झाला आहे.शेतीचे काम करण्यासाठी रोशन शेतावर असताना आचानक त्याच्यावर वीज पडली व त्याचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले. ग्रामस्थांनी तलाठी कार्यालय तसेच तहसीलदार यांना कळवले परंतु पोलीस प्रशासनाला कळवले नाही.तरी देखील सदर ठिकाणी पोलीस प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे (नेरळ पोलीस) गुडघाभर पाण्यातून पोहचले असून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत.रोशन याला शिवविच्छेदन करण्यासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले आहे…