अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
पेजारी नाका ते दिवलानपर्यंतचा परिसर पाण्याखाली गेला असून,या ठिकाणी उद्या भराव टाकल्यास पेजारी आणि चरी गावांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे,असा इशारा पंडितशेठ पाटील यांनी दिला आहे…
पंडितशेठ यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की,आम्ही कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करत नाही, मात्र त्यामुळे आमच्या परिसरात निर्माण होणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये.पाणी साचल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे…जर भराव टाकला गेला,तर पाण्याचा निचरा थांबून दोन्ही गावात पाणी घुसण्याची शक्यता आहे…
या पार्श्वभूमीवर पंडितशेठ यांनी तहसीलदार यांना आवाहन केले की,त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची तात्काळ बैठक बोलावून या समस्येचा स्थायी तोडगा काढावा.“शासनाने विकासकामे करताना स्थानिकांचा विचार करणे गरजेचे आहे. आमच्या समस्या दूर केल्याशिवाय प्रकल्प पुढे नेऊ नये,अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.सध्या पावसाळ्याची तीव्रता वाढत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.